Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

समस्या दूर झाली, व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम पूर्वीप्रमाणे काम करू लागले

Webdunia
मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (09:41 IST)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामने सोमवारी रात्री जगभरात अचानक काम करणे बंद केले. ही समस्या सोमवारी रात्री 9 च्या सुमारास समोर आली. आता हे सर्व मेसेजिंग अॅप्स पुन्हा काम करू लागले आहेत, परंतु ते काम न करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
 
आउटेज दरम्यान, लोक संदेश पाठवू किंवा प्राप्त करू शकले नाहीत. आऊटेज ट्रॅकिंग कंपनी DownDetector.com च्या मते, 80,000 पेक्षा जास्त वापरकर्त्यांनी व्हॉट्सअॅपवर आणि 50,000 पेक्षा जास्त फेसबुकवर तक्रारी दाखल केल्या. फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरकर्ते न्यूज फीड अपडेट करू शकले नाहीत, तर व्हॉट्सअॅप वापरकर्ते कोणतेही संदेश पाठवू शकले नाहीत. व्हॉट्सअॅप वर 5xx आणि फेसबुक मध्ये डोमेन नेम सिस्टीम एरर दाखवत होता.
 
फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम या तिन्हीचे मालक फेसबुक आहे. सेवा बंद झाल्यानंतर फेसबुकने म्हटले आहे की काही लोकांना अॅप वापरण्यास त्रास होत आहे. याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. लवकरच ही समस्या दूर होईल. त्याचवेळी, सोशल मीडियावर व्हॉट्सअॅपने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आम्हाला माहित आहे की यावेळी काही लोकांना अडचणी येत आहेत. आम्ही गोष्टी पुन्हा सामान्य करण्यासाठी काम करत आहोत आणि आपल्याला शक्य तितक्या लवकर कळवू. आपल्या संयमाबद्दल आभार मानतो.
विशेष म्हणजे भारतात व्हॉट्सअॅपचे 53 कोटी, फेसबुकचे 41 कोटी आणि इंस्टाग्रामचे 21 कोटी वापरकर्ते आहेत.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments