Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पवार व राहुल गांधी यांचा देशाच्या विभाजनाचा प्रयत्न करत आहेत अमित शहा यांची टीका

Webdunia
गुरूवार, 18 एप्रिल 2019 (10:21 IST)
तासगाव येथे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची सभा झाली. त्यावेळी ते म्हणाले की, आपल्या काश्मिरमधील स्थिती अतिशय गंभीर असून, तेथील नेते फारूख अब्दुल्ला काश्मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधान मागत आहेत. ते असे विधान करत असून त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पाठिंबा देत आहेत. कोणत्याही स्थितीत देशाला दोन पंतप्रधान नको आहेत असे म्हणत पवार व राहुल गांधी यांचा देशाच्या विभाजनाचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप आणि टीका भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला. तासगाव येथील विद्यानिकेतन महाविद्यालयाच्या मैदानावर भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
 
शरदराव आणि कंपनीने पंधरा वर्षांच्या काळात ७२ हजार कोटींचा गैरव्यवहार सिंचन योजनेतून केला आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी संजय पाटील यांना विजयी करावे लागेल, आवाहन त्यांनी यावेळी केले. 
 
शहा पुढे म्हणाले, राहुल गांधी आणि शरद पवार देशातील गरिबी हटवण्याची भाषा करतात, मात्र माझा त्यांना एक प्रश्न आहे की, त्यांनी आतापर्यंत गरिबी हटवण्यासाठी काय करून दाखवले आहे. मागील पाच वर्षात आम्ही ७ कोटी कुटुंबांना उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ दिला आहे. देशातील ८ कोटी कुटुंबांना शौचालये बांधून दिली. सोबतच  अडीच कोटी कुटुंबांना घरे दिली. २ कोटी ३५ लाख कुटुंबांना वीज तर ५० कोटी जनतेला आयुष्यमान भारत योजनेतून प्रत्येकी ५ लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण दिले आहे. देश काँग्रेसच्या हातात सुरक्षित राहू शकत नाही, असं शहा म्हणाले आहे. सध्या महाराष्ट्रात भाजपाचा जोरदार प्रचार सुरु असून, ते विरोधकांवर जोरदार टीका करत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने शेतकरी अपघात संरक्षण योजनेला ३ वर्षांची मुदतवाढ दिली

LIVE: महाराष्ट्र मंत्रिमंडळाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात संरक्षण योजनेला ३ वर्षांसाठी मुदतवाढ दिली

UPI MDR Charges: २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यावसायिक व्यवहारांवर शुल्क आकारले जाऊ शकते, विधेयक संसदेत सादर

पुण्यात महिलेचे नवजात बाळाच्या तोंडात प्राणघातक फेव्हिक्विक घालून अमानुष कृत्य

महाराष्ट्रातील रेजिडेंट डॉक्टर ५ ऑगस्टपासून अनिश्चित काळासाठी संपावर; सरकारी रुग्णालयांमधील OPD बंद राहणार

पुढील लेख
Show comments