Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एआय तंत्रज्ञान करू शकते एलियनचा शोध घेण्यास मदत

Webdunia
मंगळवार, 10 एप्रिल 2018 (14:31 IST)
पृथ्वी व्यतिरिक्त अन्य ग्रहांवर जीवसृष्टीचा शोध घेत असलेल्या खगोलशास्त्रज्ञांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली साहाय्यक ठरू शकते. 
 
एका ताज्या अध्ययनातून हे समोर आले आहे. ब्रिटनमधील प्लायमाउथ विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी कृत्रिम  बुद्धिमत्तेवर आधारित असलेल्या एका कृत्रिम तंत्रिका नेटवर्कचा (एएनएन) वापर करून ग्रहांचे पाच श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे. हे वर्गीकरण सध्याची पृथ्वी, प्रारंभीच्या काळातील पृथ्वी, मंगळ, बुध वा शनीचा चंद्रा टायटनच्या आधारे करण्यात आली आहे. प्रत्येक बाबतीत जीवसृष्टीच्या शक्यतेचा अंदाज बांधण्यात आला आहे. 
 
या सगळ्या स्थानांवर वातावरण असून सौरमालिकेतील जीवनासाठी ही स्थाने सर्वाधिक अनुकूल आहेत. प्लायमाउथ विद्यापीठाच्या प्राध्यापक क्रिस्टोफर बिशप यांच्या माहितीनुसार, सध्या शास्त्रज्ञांची रुची एक काल्पनिक, बुद्धिमान, सौरमालिकेत अस्तित्वात असलेल्या ग्रहांचे विश्र्लेषण करणार्‍या अंतराळ यानाला प्राथमिकता देण्यासाठी या कृत्रिम तंत्रिका नेटवर्कमध्ये आहे. भविष्यात रोबोटिक अंतराळ यानामध्ये औद्योगिक उपयोगाची आवश्यकता भासल्यास त्याची गरज पडेल. कृत्रिम तंत्रिका नेटवर्क अशी प्रणाली आहे, जी मानवी मेंदूप्राणे समजून घेण्याचा प्रयत्न करते. लीव्हरपूलमधील युरोपियन वीक ऑफ स्ट्रोनॉमी अँड स्पेस सायन्समध्ये हे अध्ययन प्रसिद्ध झाले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

तिबेट, बंगालचा उपसागर आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

सोलापूर : कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली

पुढील लेख
Show comments