Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुजय विखेंसाठी गेला लग्न पत्रिकेतून मत मागायला नवरदेव पोहोचला तुरंगात

Webdunia
शनिवार, 6 एप्रिल 2019 (12:52 IST)
लग्न एक मोठा सोहळा असून अनेकजन हा अविस्मरणीय करण्यासाठी काहीतरी वेगळे करतात. त्यात लग्नपत्रिका म्हटली की अनेकदा हटके प्रयोग केले जातात. सामाजिक संदेश दिला जातो तर अनेकदा आपल्या आवडत्या सेलिब्रिटी आणि राजकीय पुढाऱ्याला पाठींबा मागितला जातो. मात्र अहमदनगर येथील एका ने आपली लग्नपत्रिक बनवली आणि तो थेट तुरुंगात गेला होता. यामध्ये  लग्नात भेट वस्तू नको, परंतु आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉ. सुजय विखे यांना जरूर मत द्या’, अशी विनंती करणाऱ्या निघोज (जि. नगर) येथील फिरोज शेख या उच्चशिक्षित तरुणावर आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल झाला असून त्याच्यावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणूक विभागाचे निवासी उपजिल्हाधिकारी पाटील तसेच पारनेरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्या आदेशान्वये फिरते पथक अधिकारी शान मोहंमद शेख यांनी फिरोज विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, निघोज येथील निवृत्त पोष्टमास्तर अल्लाउददीन शेख यांचा बीएसस्सी फिजिक्स, एमबीए शिक्षण झालेला मुलगा फिरोज याचा विवाह हसनापूर (ता. राहता) येथील रहेमान पठाण यांची मुलगी मोसिना हिच्याशी ३१ मार्च रोजी डॉ. सुजय विखे यांचे गाव असलेल्या प्रवरानगर येथे पार पडला.या विवाहासाठी शेख यांनी छापलेल्या पत्रिकेमध्ये ”किसी भी तरह का तोहफा मत दिजीए, मगर अपने सुनहरे कल के लिए डॉ. सुजयदादा विखे पाटीलजी को जरूर वोट दिजीए’ असे अवाहन करण्यात आले होते.या पत्रिकेची जिल्ह्यात चांगलीच चर्चा झाली. विखे समर्थकांनीही सोशल मीडियावर फिरोजची पत्रिका अपलोड करून डॉ. विखे यांच्यावर कार्यकर्त्यांचे किती प्रेम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला.मात्र झाले उलटेच फिरोज याचे हे कृत्य आचारसंहिता कक्षातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याची चौकशी केली असता त्यात तथ्य आढळून आले. पत्रिका ताब्यात घेण्यात येऊन शान मोहंमद शेख यांनी गुरुवारी पहाटे फिरोज याच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला होता. फिरोजला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. नेत्याला खुश करायला गेला आणि अडचणीत सापडला अशी गत फिरीजची झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

भारतात कोविड परतला, मुंबईत कर्करोग आणि किडनीच्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

नागपूर : व्यापाऱ्यांनी १५५ कोटी रुपयांचा अपहार केला, गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक

LIVE: प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संपावर

प्राणघातक कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांच्यासाठी ट्विट केले

कारमध्ये बंद झाल्याने चार मुलांचा गुदमरून मृत्यू

पुढील लेख
Show comments