Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

1 तासाभरात ही थाळी संपवा, नवी बुलेट जिंका

Webdunia
शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (12:40 IST)
याला खवय्यांसाठी एक सुवर्णसंधी असेच म्हणावे लागणार आणि त्यातून जर आपल्याला रॉयल एन्फिल्ड बुलेटची आवड असेल तर मग नक्कीच हे चॅलेज आपल्यासाठी फायद्याचे ठरेल.
 
पुण्यातील एका रेस्टॉरंटने एक थाळी एक तासभरात संपल्यावर चक्क बुलेट जिंकण्याची ऑफर दिली आहे. वडगाव मावळमधील शिवराज हॉटेलने विराट ‘बुलेट थाळी’ एका तासात संपवा आणि बुलेट बाईक जिंका अशी ऑफर दिली आहे. 
 
हॉटेल मालकांनी आपल्या हॉटेलबाहेर ५ नव्या बुलेटही उभ्या केल्या आहेत. या ऑफर अंतर्गत सुमारे 1 लाख 65 हजार रुपयांची बुलेट ‍जिंकण्यासाठी आपल्याला भव्य थाळी तासभरात फस्त करावी लागेल. बुलेट थाळीची किंमत ४ हजार ४४४ रुपये इतकी आहे. या ऑफरमुळे हॉटेलला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे.
 
आतापर्यंत सोलापूर रहिवासी सोमनाथ पवार बुलेट थाळी स्पर्धेचे विजेते ठरले आहेत. त्यांनी चार किलो वजनाची थाळी एका तासाच्या आत फस्त केली.
 
यापूर्वी आठ किलोची रावण थाळी चौघांनी 60 मिनिटात संपवण्याचं आव्हान शिवराज हॉटेलमध्ये होतं. विजेत्याला पाच हजार रुपयांचं रोख पारितोषिक मिळणार होतंच, शिवाय विजेत्यांना थाळीसाठी एक रुपयाही मोजावा लागणार नव्हता.
 
काय आहे बुलेट थाळी डबल चॅलेंज
या थाळीत तब्बल बारा पद्धतीच्या वेगवेगळ्या डिश आहेत. हे पदार्थ तयार करण्यासाठी चार किलो मटण आणि मासे वापरले जातात. 55 जण ही थाळी तयार करतात.
 
बुलेट थाळी मध्ये पापलेट, सुरमई, चिकन लेग पीस, कोलंबी करी, मटन मसाला, चिकन फ्राय, कोळंबी बिर्याणी, भाकरी, रोटी, सुकट, कोलंबी कोळीवडा, रायता, सोलकडी, रोस्टेड पापड, मटण अळणी सूप एवढे पदार्थ देण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments