Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई इंडियन्सचं आयपीएलमधलं आव्हान अखेर साखळीतच संपुष्टात

Webdunia
सोमवार, 21 मे 2018 (08:48 IST)

मुंबई इंडियन्सचं आयपीएलमधलं आव्हान अखेर साखळीतच संपुष्टात आलं  आहे. त्यामुळे रोहित शर्मासह   खेळाडूना मोठा धक्का बसला आहे.  दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून अकरा धावांनी मुंबई इंडियन्सला अखेरच्या साखळी सामन्यात  पराभव स्वीकारावा लागला   आहे.  या पराभवामुळंच मुंबईचं आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आले आहे.  दिल्लीनं मुंबईला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं ,  दिल्लीने मुंबईचा ११ धावांनी पराभव करत स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. दिल्लीचा संघ याआधीच आयपीएलमधून बाहेर गेला आहे. मुंबईने २०१३, २०१५ आणि २०१७ मध्ये आयपीएलचा चषक  जिंकला होता.  लमिछानेनं 36 धावांत तीन, तर मिश्रानं 19 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. त्याआधी रिषभ पंत आणि विजय शंकर यांच्या चमकदार फलंदाजीनं दिल्लीला चार बाद 174 धावांची मजल मारून दिली होती. पंतनं 64 धावांची, तर विजय शंकरनं नाबाद 43 धावांची खेळी केली होती ,  मुंबईच्या दोन्ही सलामीविरांना फिरकीपटूंनी बाद केले. मुंबईचे १० पैकी ६ फलंदाजांना फिरकपटूंनी बाद केले त्यामुळे मुंबईचा पराभव झाला. सूर्यकुमार, ल्युईस, किशन, कृणाल आणि हार्दिक पांड्या, पोलार्ड ही आघाडीची फळी दिल्लीच्या फिरकीमुळे आउट झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments