Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकार जागं झालं नाही तर जनताच यांचं सरण रचेल - नवाब मलिक

Webdunia
गुरूवार, 19 एप्रिल 2018 (09:27 IST)
यवतमाळ जिल्ह्यातील दोन तर कर्जत येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यातला धक्कादायक प्रकार म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील माधव रावते या शेतकऱ्याने स्वतःचेच सरण रचून आत्महत्या केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी असे म्हटले आहे की सरकार जागं झालं नाहीतर जनताच यांचं सरण रचेल.

पुढे बोलताना मलिक म्हणाले की शेतकऱ्यांनी स्वतःचेच सरण रचून आत्महत्या करणे ही महाराष्ट्रासाठी धक्कादायक बाब आहे. सरकारने मोठा गाजावाजा करत #कर्जमाफी योजनेची घोषणा केली. मात्र कोणत्याही शेतकऱ्याला त्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळेच राज्यात आत्महत्यांची संख्या वाढत आहे. सरकारने घोषणाबाजी बंद करत प्रत्यक्षात काम करावे असेही ते म्हटले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

नागपूर : व्यापाऱ्यांनी १५५ कोटी रुपयांचा अपहार केला, गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक

LIVE: प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संपावर

प्राणघातक कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांच्यासाठी ट्विट केले

कारमध्ये बंद झाल्याने चार मुलांचा गुदमरून मृत्यू

पुण्यात भारतीय हवाई दलाचा अधिकारी असल्याचे सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुढील लेख
Show comments