Dharma Sangrah

दिल्ली सारखी आता मुंबई प्रदूषण झाले धुके नाही ते तर धुरके

Webdunia
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018 (09:33 IST)
0
आता जसा हिवाळा येतोय तसे वातावरण बदलत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई सुद्धा बदलत आहे मात्र कारण थोडे वेगळे आहे. सध्या मुंबईत सकाळी हवेत जाणवणारा गारवा, दिसणारे धुरकट वातावरण यामुळे धुकेच पसरले आहे की काय? असे वाटते. मात्र हे धुके नक्कीच नाही तर  धूलिकण आणि प्रदूषण धूरमिश्रित धुरके आहे असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पहाटे वातावरणात गारवा जाणवत असला तरी ती थंडी नाही. मुंबईत थंडीचे आगमन डिसेंबरच्या मध्यानंतरच होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईचे ‘हिवाळी’अधिवेशन लांबणार असल्याचे दिसते आहे. त्यामुळे आता मुंबई देखील दिल्लीच्या वाटेवर आहे असे दिसते. दिवाळीतील फटाक्यांमुळे सध्या हवेची गुणवत्ता घसरली आहे. त्यातच वातावरणातील धूलिकण आणि धूर, आर्दतेचे वाढलेले प्रमाण यामुळे मुंबई धुरक्यात हरवली आहे. वांद्रे, अंधेरी, वरळी, प्रभादेवी, कुलाबा या भागांमध्ये पहाटे आणि सायंकाळच्या वेळी धुरक्याची जणू चादरच पसरली आहे. धुरक्यामुळे नाकातून पाणी येणे, डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे या लक्षणांनी मुंबईकर हैराण झाले आहेत. त्यामुळे आता भविष्यात मोठा प्रश्न निर्माण होणार हे मात्र नक्की.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

Bank Holidays in February: फेब्रुवारी महिन्यांत बँका एकूण 9 दिवस बंद राहणार

बजेटच्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांचा निवडणूक प्रचार स्थगित करण्याचा निर्णय

समृद्धी एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, ठाण्यातील आई व मुलाचा दुर्देवी मृत्यू

अर्थसंकल्पात आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वाढवली, परदेशातील शिक्षण स्वस्त झाले

पुढील लेख
Show comments