Festival Posters

‘ही’ वाहिनी लॉकडाउनच्या काळात ठरली ‘अव्वल’

Webdunia
शनिवार, 11 एप्रिल 2020 (06:53 IST)
4
लॉकडाउनच्या काळात लोकांना घरातच थांबवण्यासाठी ‘रामायण’सारख्या जुन्या लोकप्रिय मालिकांचे पुन्हा प्रसारण करणे दूरदर्शनच्या चांगलेच पथ्यावर पडले असून ३ एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात दूरदर्शन ही देशातील सर्वाधिक पाहिली गेलेली दूरचित्रवाणी वाहिनी ठरली आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलने (बीएआरसी) गुरुवारी जाहीर केलेल्या माहितीवरून ही बाब समोर आली आहे.
 
दूरदर्शनच्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेतील प्रेक्षकसंख्या तब्बल ४० हजार टक्क्यांनी वाढली आहे. यामागे रामायण आणि महाभारत, या मालिकांचेच प्रामुख्याने योगदान आहे, असे ‘बीएआरसी’ने स्पष्ट केले. सध्याच्या लॉकडाउनच्या काळात खासगी वाहिन्यांच्या प्रेक्षकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. तीन आठवड्यांच्या लॉकडाउन दरम्यान रामायणसह महाभारत, शक्तिमान आणि बुनियाद यांसारख्या जुन्या लोकप्रिय मालिकांचे दूरदर्शनने पुन्हा प्रसारण सुरू केले आहे. यापैकी बहुतांश मालिकांची निर्मिती दूरदर्शननेच दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या क्षेत्रात मक्तेदारी असताना केली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

'पायलट अचानक बदलले'; कागदपत्रे जळाली नाही पण मृतदेह जळाले; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजित पवार यांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

LIVE: अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना एकत्र करू इच्छित होते- संजय राऊत यांचा दावा

हरियाणाच्या देविका सिहागने थायलंड मास्टर्सचे पहिले विजेतेपद जिंकून भारताला गौरव मिळवून दिला

T20 World Cup पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला; आयसीसीच्या नियमांचे पालन करीत टीम इंडिया श्रीलंकेला जाणार

बीडमध्ये अपघातात शिवसेना नेत्याचा मृत्यू

पुढील लेख
Show comments