Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जिवंत काय, मेल्या नंतरही जमिनीत गाडता येणार नाही -पंतप्रधान मोदीं

Webdunia
शुक्रवार, 10 मे 2024 (18:50 IST)
महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात निवडणुका होणार आहेत, त्यापैकी 3 टप्पे पूर्ण झाले आहेत. याच क्रमाने 13 मे रोजी होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवारी नंदुरबार येथे सभा घेतली त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 
 
मोदींनी मराठी भाषेत जनतेचे आभार मानून भाषणाला सुरुवात केली. पीएम मोदी म्हणाले की, आज अक्षय्य तृतीयेचा सण आहे, त्यामुळे आज मी देशातील जनतेला आणि विशेषतः शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो. पंतप्रधान मोदींनीही परशुराम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. आज या सभेत खूप जण मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहे. अक्षय्य तृतीयेचे आशीर्वादही चिरंतन आहे.याचा अर्थ देशात पुन्हा एकदा भाजपचेच सरकार येणार आहे. 
 
पंतप्रधान म्हणाले की, आदिवासींची सेवा ही कुटुंबाची सेवा आहे.इथल्या जंगलात राहणाऱ्या लोकांना पाणी आणि विजेची खूप समस्या होती. पण आमच्या सरकारने तो प्रश्न सोडवला आहे. पंतप्रधान म्हणाले की, पीएम आवास अंतर्गत 1.25 लाख लोकांना घरे देण्यात आली आहेत.
 
लोक निवडणुकीच्या काळात गावात जातात आणि ज्या कुटुंबाला गॅस, घर, पाणी मिळालेले नाही, ते पाहता त्यांची नावे पाठवा. तिसऱ्या टर्ममध्ये 3 कोटी लोकांना कायमस्वरूपी घरे मिळतील ही माझी हमी आहे,घर म्हणजे केवळ चार भिंती नसून वीज, पाणी आणि गॅसचे कनेक्शन देखील आहे. 
 
आदिवासी भागात मोठी समस्या आहे कुपोषण  या आजाराचा नायनाट करण्यासाठी ते काम करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. कोणीही कुपोषणाला बळी पडू नये, म्हणून येथील 12 लाख लोकांना मोफत रेशन देण्यात आले आहे, 
 
काँग्रेसने संविधानाच्या पाठीत खरा घातल्याचे पाप केले आहे. आदिवासी आणि मागासवर्गीयांचे आरक्षण हिसकावून ते अल्पसंख्याकांना देण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे. 
 
एससी एसटी ओबीसीचे आरक्षण वाचवण्यासाठी मी महायज्ञ करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जोपर्यंत मोदी जिवंत आहेत, तोपर्यंत मी कोणत्याही धर्माच्या आधारे एससी, एसटी आणि ओबीसींना एक टक्काही आरक्षण देऊ देणार नाही, असे मोदी म्हणाले.आम्ही माता शबरीची पूजा करणारी माणसे आहोत, पण काँग्रेसने आदिवासींना कधीच आदर दिला नाही आणि त्यांना सन्मान मिळू दिला नाही,
 
शिवसेनेचे हे खोटे लोक मला जिवंत गाडण्याची भाषा करत आहेत आणि काँग्रेस म्हणते की मोदी तुमची कबर खोदतील,
 
त्यांची व्होट बँक खूश राहावी म्हणून ते मला गाडून टाकण्याची चर्चा करतात. पंतप्रधान म्हणाले की, मी बाळासाहेब ठाकरे यांना जवळून पाहिले आहे. पण हे खोटे शिवसेनेचे लोक मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना सोबत घेऊन रॅलीत घेत आहेत. बिहारमध्ये चारा घोटाळ्यातील आरोपींना खांद्यावर घेऊन चालवले जात आहे. पंतप्रधान म्हणाले की ते मला दफन करण्याबद्दल बोलत आहेत परंतु त्यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे. पंतप्रधान म्हणाले की, देशातील महिला आणि भगिनी माझे संरक्षण कवच आहेत. पीएम म्हणाले की, जिवंत असताना काय ते मला मृत्यूनंतरही जमिनीत गाडू शकणार नाहीत.

Edited By- Priya Dixit  
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र-गुजरातमध्ये वादळाचा इशारा Weather Update

अहिल्यानगरच्या श्रीरामपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत 14कोटी किमतीचे ड्रग्ज जप्त केले

पाकिस्तानशी फक्त दहशतवाद आणि पीओके रिकामे करण्यावर चर्चा होईल,परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले

राज्याला विकसित महाराष्ट्र बनवण्यासाठी बावनकुळे यांनी महसूल विभागासाठी रोडमॅप तयार केला, शतक पूर्ण केले

LIVE: मुंबईत लाडकी बहीण योजनेच्या खात्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार, तिघांना अटक

पुढील लेख
Show comments