Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र : पीएम नरेंद्र मोदींसोबत राज ठाकरे व्यासपीठावर एकत्र, राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे केले कौतुक

raj thackeray
, शनिवार, 18 मे 2024 (09:35 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे शुक्रवारी मुंबईमध्ये एका रॅलीमध्ये पीएम नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकत्र व्यासपीठावर दिसलेत. तसेच राज ठाकरेंनी अयोध्यामध्ये राम मंदिरचे निर्माण आणि जम्मू काश्मीर मधून अनुच्छेद 370 ला निरस्त करणे यांसारख्या निर्णयांसाठी केंद्रसरकारचे कौतुक केले.  
 
दादरमधील मोठया शिवाजी पार्क मध्ये रॅलीला संबोधित करित राज ठाकरे यांनी आपल्या भाषण दरम्यान पीएम मोदींना तिसऱ्या कार्यकाळासाठी आपल्या अपेक्षा सांगितल्या. ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि महाराष्ट्र मध्ये त्यांच्या सत्तारूढ सहयोगिनां विना शर्त समर्थन दिले. 
 
मनसे नेता यांनी राम मंदिर निर्माण, अनुच्छेद 370 काढून टाकणे आणि तीन घटस्फोट वर प्रतिबंध लावणे यांसारख्या निर्णयांसाठी म्हणालेत की, मी यांना धाडसी निर्णय मानतो. आता माला आशा आहे की, पीएम मोदी मराठीला शास्त्रीय भाषेचा दर्जा देतील. देशामध्ये शाळांच्या अभयसक्रमात मराठा इतिहास सहभागी करतील. तसेच छत्रपतींच्या किल्ल्यांना सुरक्षित करतील. 
 
पीएम नरेंद्र मोदी मुंबईमध्ये काय म्हणालेत? 
पीएम मोदींनी महाराष्ट्रातील मुंबईमध्ये निवडणूक प्रचार केला. इथे त्यांनी एनडीए युती उमेदवारासाठी मत मागितली आमी लोकांना सांगितले की, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मुंबईची महत्वाची भूमिका आहे. 
 
शिवाजी पार्क मध्ये आपले भाषण संपल्यानंतर त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकर यांना श्रद्धांजली वाहिली. यादरम्यान त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. पीएम मोदी म्हणालेत की, देशाच्या स्वातंत्र्यांनंतर गांधी यांचा सल्ला ऐकून जर काँग्रेसला भंग केले असते तर देश आज पाच दशक पुढे असता. पीएम मोदी म्हणालेत की, आज जगाचा आधुनिकतम इंफ्रास्ट्रक्चर मुंबईला मिळत आहे. इथे अटल सेतू आहे. मुंबई मेट्रोचा विस्तार होत आहे. मुंबई लोकलचे आधुनिकरण होते आहे. नवीन मुंबईमध्ये एयरपोर्ट बनते आहे. वंदे भारत ट्रेन चालू आहे. आणि आता ते दिवस दूर नाही जेव्हा देशाची पहिली बुलेट ट्रेन मुंबईमध्ये धावेल. 

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात पुन्हा येणार मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना दिला पावसाचा अलर्ट