Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरेंची गरज काय? मनसेला महायुतीत घेऊ नये; रामदास आठवले

Webdunia
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024 (19:48 IST)
पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर, भाजपासह अनेक पक्ष लवकरच यादी जाहीर करतील, असे सांगितले जात आहे. मनसे पक्ष महायुतीत सहभागी होऊ शकतो, अशा चर्चा राजकीय वर्तुळात असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठे विधान केले आहे. मनसेला महायुतीत घेऊ नये, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
 
पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती आहे. या मुख्य ताकदीला मदत करणारी आरपीआयची छोटी ताकद आहे. निवडून आणण्यासाठी काही मतांची गरज असते, ती जबाबदारी आरपीआयची आहे. त्यामुळे नेत्यांना नम्र विनंती आहे की, मी राज्यसभेचा खासदार असलो तरीही, लोकसभेचा माणूस आहे. यामुळे रिपब्लिकन पक्षाला जागा देणे आवश्यक आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत रिपाइंला सोलापूर व शिर्डी या दोन जागा द्याव्यात अशी आग्रही मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

उद्धव यांच्या पक्षात फूट? प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदींचे कौतुक केले, संजय राऊत काय म्हणाले...

'मनमोहन सिंग यांना इशारा देण्यात आला होता, तरीही PMLA तुरुंगात पाठवण्यासाठी एक शस्त्र बनले', शरद पवारांचा मोठा खुलासा

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Monsoon Update 2025: महाराष्ट्रातही वेळेपूर्वी मान्सून, IMD चा अंदाज, 'या' जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

पुढील लेख
Show comments