Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

Webdunia
मंगळवार, 7 मे 2024 (20:51 IST)
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात पाटसांगवी या ठिकाणी दुपारी 12 च्या सुमारास चाकूने हल्ला करून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना वैयक्तिक वादावरून घडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तर ही हत्या वैयक्तिक नसून राजकीय वादातून झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. 

धाराशिव लोकसभा मतदार संघातील भूम तालुक्यात पाटसांगवी येथे दोन गटात मंगळवारी राडा झाला. मतदार आणण्यावरून हा वाद झाला नंतर या वादातून दिन गटात आपसात भांडण झाले आणि चाकूने वार करत एकाची हत्या करण्यात आली. तर तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

गेल्या काही दिवसांपासून दोन गटात हा वाद सुरु होता. या वादात समाधान पाटील याचा खून झाला असून गौरव नाईकनवरे या तरुणाने खून केला असून तो सध्या पसार झाला आहे. तरुणाचा  मृतदेह तालुका रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. राजकीय वादातून हा खून झाल्यामुळे वातावरण चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
या हत्येमुळे निवडणुकीला गालबोट लागल्याचे सांगितले जात आहे. तरुणाच्या हत्येमुळे भूम तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.  
 
Edited By- Priya Dixit   
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर देहाचे रहस्य काय होते?

Ramayan रामायण काळातील 5 सर्वात शक्तिशाली महिला

18 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण, या 5 राशींसाठी खूप धोकादायक !

जीवनसाथी तुमचा चांगला मित्र होण्यासाठी हे टीप्स अवलंबवा

उष्ट का खाऊ नये,हे आरोग्यासाठी हानिकारक का आहे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबई विमानतळावर इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात टेकऑफच्या आधी बिघाड

रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसून 3 महिलांचा मृत्यू

नितीन गडकरींना पंतप्रधानपदाची ऑफर आली, नकार देत म्हणाले-

आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचा इतिहास, महत्त्व जाणून घ्या

IPL 2025:धोनीबाबत चेन्नई सुपर किंग्ज संघ घेऊ शकतो मोठा निर्णय!

पुढील लेख
Show comments