Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'येड पांघरूण पेडगावला जायचं होतं' की त्यांचा 'अभ्यास कमी होता' : अजित पवार

Webdunia
बुधवार, 16 मार्च 2022 (21:15 IST)
राज्याच्या अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत भाषण केलं. आपल्या भाषणात अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं. केंद्रातील योजना या अर्थसंकल्पात होत्या असं विरोधी पक्ष बोलत होते. मला कळत नाही यांना 'येड पांघरूण पेडगावला जायचं होतं' की त्यांचा 'अभ्यास कमी होता' म्हणून अर्थसंकल्पावर टिका करत होते असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.
 
अर्थसंकल्पावरील चर्चेवर उत्तर देताना अजित पवार यांनी 'सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयाची बरे, या संत तुकारामांच्या अभंगाने सुरुवात केली. राज्य अडचणीतून पुढे जात असताना राज्याला कर्जातून बाहेर काढताना महसूली तुट कशी कमी करता येईल, नागरीकांवर कराचा भार पडता कामा नये व राज्याचा गाडा सुरळीत चालेल, विकासाला खीळ बसणार नाही असा प्रयत्न या अर्थसंकल्पात केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. 
 
या आहेत मोठ्या घोषणा 
 
अजित पवार यांनी सर्व आमदारांना 5 कोटीचा विकास निधी तर आमदारांच्या चालकाला 20 हजार रुपये आणि आमदारांच्या स्वीय सहाय्यकाला 30 हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली. 
 
राज्यातील आमदारांचा विकास निधी आता चार कोटी रुपयांवर पाच कोटी इतका झाला आहे.  त्यामुळे आमदाराला त्यांच्या मतदारसंघात विकास कामांसाठी प्रत्येक वर्षी पाच कोटींचा निधी मिळणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आमदारांच्या विकास निधीत दोन वर्ष वाढ करण्यात आली नव्हती. 
 
आमदारांचे पीए आणि ड्रायव्हरच्या पगारातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ड्रायव्हरचा पगार 15 हजारावरुन वीस रुपये करण्यात आला आहे. तर आमदारांच्या पीएचा पगार 25 हजारावरुन 30 हजार करण्यात आला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

तिबेट, बंगालचा उपसागर आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

सोलापूर : कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली

पुढील लेख
Show comments