Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Manipur राज्यातील सर्व 60 जागांसाठी भाजपचे उमेदवार घोषित, फक्त तीन महिलांना तिकीट

Webdunia
सोमवार, 31 जानेवारी 2022 (10:25 IST)
भारतीय जनता पक्ष (BJP) ने मणिपूर विधानसभा निवडणुकीसाठी 2022 च्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपने रविवारी राज्यातील सर्व 60 जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. 60 जागांच्या या राज्यात भाजपने केवळ तीन महिला उमेदवारांना तिकीट दिले आहे.
 
भाजपने मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांना हिंगंग मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उमेदवारांच्या नावांची घोषणा करताना भाजप नेते संबित पात्रा म्हणाले की, मणिपूरमध्ये आमच्या पक्षात कोणताही वाद नाही. आम्ही दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करू.
 
मणिपूर विधानसभेच्या 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
60 सदस्यीय मणिपूर विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 27 फेब्रुवारीला आणि दुसऱ्या टप्प्यात 3 मार्चला मतदान होणार आहे, तर 10 मार्चला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना 1 फेब्रुवारी रोजी जारी केली जाणार आहे. या टप्प्यातील उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी आणि नामांकन मागे घेण्याची अंतिम तारीख 11 फेब्रुवारी असेल.
 
मणिपूरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची अधिसूचना 4 फेब्रुवारीला जारी केली जाणार आहे. या टप्प्यात 11 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी असेल. निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, राज्यातील 57 टक्क्यांहून अधिक लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. त्याच वेळी, 43% पेक्षा जास्त लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यावर मंत्री विजय शाह यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

महाराष्ट्र सरकारने शाळांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली,बाल सुरक्षा आणि जागरूकतेवर भर दिले

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उद्घाटन

अनिल देशमुख यांनी बनावट शिक्षक भरतीवरून सरकारवर हल्लाबोल केला

अमित शहांनी फोडली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस! संजय राऊत यांची पुन्हा अमित शहांवर टीका

पुढील लेख
Show comments