Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तर भाजपच्या खासदारकीचा राजीनामा; संभाजीराजेंचा इशारा

Webdunia
मंगळवार, 25 मे 2021 (13:04 IST)
राजीनामा देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर मी आताच खासदारकीचा राजीनामा देईन, असा इशाराच भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिलाय. संभाजीराजे छत्रपती यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीचा अहवाल रद्द केल्यानंतर मराठा समाजातील प्रमुखांची आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे राज्य दौऱ्यावर आहेत.
 
यावेळी  पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना त्यांनी थेट राजीनामा द्यायला तयार असल्याचं बोलून दाखवलं. राजीनाम्याने जर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तत्काळ राजीनामा देईन, असं असं ते म्हणाले. संभाजीराजेंच्या राजीनाम्याच्या विधानानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात. छत्रपती शाहू 
महाराजांचा आशीर्वाद घेऊन भाजप खासदार संभाजी छत्रपती  महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या भावना जाणून घेणार आहेत. त्यानंतर येत्या २७ मे रोजी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षनेते आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा करणार आहेत.
 
मराठा आरक्षणाबाबत मी अनेक कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांनी काही सल्ले दिले आहेत. त्याची माहिती सरकारला देणार आहे. आंदोलन हा एक भाग असू शकतो, पण मराठा आरक्षणाबाबत सरकारला काय सूचना करता येईल? मराठा आरक्षणावर काय कायदेशीर मार्ग आहे? याची माहिती घेण्यासाठी हा दौरा करण्यात येत आहे. त्यातून समाजाच्या व्यथाही समजून घेता येणार आहे, असं संभाजी छत्रपती म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

"आरक्षणाच्या मागण्या घटनात्मक चौकटीत असतील तरच सरकार त्यावर कारवाई करेल," फडणवीसांचे उघडपणे भाष्य

LIVE: महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; पालघरमध्ये राष्ट्रविरोधी टेलिग्राम ग्रुपचा पर्दाफाश

सूर्यग्रहणापूर्वी शक्तिशाली भूकंपानंतर कोलंबियामध्ये आणखी २१ भूकंपाचे धक्के; २५० लोकांचा मृत्यू तर ३,००० बेपत्ता

मित्राला मारहाण करून पळवले अन् १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार; पालघरमधील धक्कादायक घटनेने खळबळ

छत्रीचा 'माईक' अन् मिश्किल टोला! रायगडच्या शाळकरी मुलींच्या 'रिपोर्टिंग'मुळे रस्त्याचे खड्डे बुजवले

पुढील लेख
Show comments