suvichar

मनोज जरांगेंचे छगन भुजबळांना प्रत्युत्तर

Webdunia
सोमवार, 29 जानेवारी 2024 (13:46 IST)
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आमरण उपोषण केले होते. या साठी त्यांनी अंतरवली सराटी येथून आंदोलन केले होते. त्यांनी केलेल्या आंदोलनाला यश आलं असून राज्य सरकारने त्यांच्या मागण्याला पूर्ण केल्या आहे. राज्य सरकार कडून मध्यरात्री अध्यादेश काढण्यात आला असून त्याची प्रत मनोज जरांगे यांना दिली आहे. या अध्यादेशात सग्यासोयरानां देखील प्रमाणपत्र दिले जाण्याचा मुद्दा सम्मिलीत आहे.

या वरून राष्ट्रवादीचे अजितपवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाराजी दाखवली असून त्यांनी मनोज जरांगे यांच्या मागणीला विरोध दर्शवला आहे. भूजबळ यांनी या विरोध प्रदर्शन म्हणून  3 फेब्रुवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यात ओबीसी मेळाव्याचे आयोजन केले आहे. मनोज जरांगे यांनी छगन भूजबळांना सडेतोड उत्तर दिले आहे.  

या मेळाव्याचे काहीच होणार नसून मराठ्यांना आरक्षण मिळालं आहे. मराठ्यांनी कसलीही काळजी करण्याची गरज नाही. सरकार ने अधिसूचना काढली असून यावर 15 दिवसांत लोकांच म्हणणं मागवलं आहे. सगेसोयरे हा शब्द फायनल झाला असून या मध्ये महाराष्ट्रातील मराठ्यांचं कल्याण आहे. काळजी करण्याची कारण नाही.

समाजासाठी काहीही अडचणी आल्यास मी उभा आहे. मराठे जिंकून आले आहे. गोर गरिबांसाठी सगेसोयरे कायदा झाला अशे काही जण आहे ज्यांना विचारलं नसेल म्हणून दुःख होत असेल. एखाद्याच चांगलं होत असताना अन्नात माती कालवयाची.त्या कायद्याला काहीही होणार नाही. असे जरांगे म्हणाले.   

Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

८८ अयातुल्ला खमेनी अजूनही जिवंत आहेत, ही लढाई दीर्घकाळ चालेल

LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या ११ नगरसेवक आणि कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

परराष्ट्र धोरणावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

राज्यसभा निवडणुकीवर आदित्य ठाकरे यांचे मोठे विधान: 'महाविकास आघाडीत कोणताही गतिरोध नाही म्हणाले

मुंबई आणि पुण्यातील भाविकांना महाकालेश्वर आणि उत्तर भारतातील दर्शनासाठी रेल्वे भारत गौरव ट्रेन चालवणार

पुढील लेख
Show comments