Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारनेच आंदोलनाला हिंसक वळण दिले असा मुख्य आरोप - मराठा क्रांती मोर्चा

Webdunia
बुधवार, 1 ऑगस्ट 2018 (08:43 IST)
मराठा आरक्षणासाठी ०९ ऑगस्टपासून व्यापक जन आंदोलन केले जाणार आहे. महिला, मुलं, पाळीव जनावरांसोबत प्रत्येक गावात आंदोलन उभारले जाईल. काही दिवसात मंत्री, खासदार आणि आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल असे मराठा क्रांती मोर्चाच्या लातुरात पार पडलेल्या राज्यस्तरीय बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
 
राहीचंद्र मंगल कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला २२ जिल्ह्यातील समन्वय समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत एकूण नऊ ठराव घेण्यात आले. मराठा आंदोलनाला सरकारनेच आंदोलनाला हिंसक वळण दिले असा मुख्य आरोप या बैठकीत करण्यात आला. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, शासनाला यापूर्वीच मागण्यांचे निवेदन दिले आहे. आता कसलीही चर्चा करायची नाही आणि कुणाचीही मध्यस्थी नको आहे, ०१ ऑगस्टपासून त्या त्या जिल्ह्यामध्ये मंत्री, आमदार आणि खासदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल, मराठा आंदोलनातील शहिदांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये द्यावेत, या कुटुंबातील सदस्यास सरकारी नोकरीत सामावून घ्यावे, काकासाहेब शिंदे आणि तोडकर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकार्‍यांची एसआयटी चौकशी करावी, केवळ मराठा आरक्षणासाठी विधीडळाचे अधिवेशन बोलवावे, आरक्षण मिळेपर्यंत राज्य सरकार सोबत असहकार आंदोलन केले जईल, राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाची या नंतरची बैठक परभणी येथे आयोजित केली जाईल असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

LIVE: आयएएस तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या २९ कर्मचाऱ्यांना थेट इशारा दिला

नियमांनुसार काम करता येत नसेल तर राजीनामा द्या…तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या २९ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

ट्रेनमध्ये धूम्रपान करणे आता खूप महागात पडणार! रेल्वेने दंड २० पटीने वाढवून ₹१०० वरून ₹२,००० केला

"तुम्हाला काम करायचे नाही, तर पगारही घेऊ नका," मुंबई उच्च न्यायालयाने डॉक्टरांना फटकारले; संप तात्काळ मागे घेण्याचे आदेश

उत्तम पीक येण्यासाठी आणि चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतीची महत्त्वाची कामे

पुढील लेख
Show comments