Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मग नोकऱ्या कशा मिळतील, राज ठाकरे यांचा सवाल

Webdunia
सोमवार, 6 ऑगस्ट 2018 (09:08 IST)
राज्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात ७,५०० तरुणांवर हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. यामुळे भविष्यात आरक्षण मिळाले, तरी गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांना नोकऱ्या कशा मिळतील, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मनसे कामगार सेनेच्या वाशीतील मेळाव्यात ते बोलत होते.
 
सर्वच राजकीय पक्षांकडून आरक्षणाचे केवळ राजकारण केले जात आहे. एकीकडे तरुणांना पेटवायचे आणि दुसरीकडे त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे. या वृत्तीमुळे गेल्या काही दिवसांत मराठा आरक्षणाच्या झालेल्या आंदोलनांमध्ये राज्यातील ७,५०० तरुणांवर हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले.
 
रस्त्यांवर गणेशोत्सव साजरा करण्याबाबत लादल्या जात असलेल्या मर्यादांबाबत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. छोट्याशा जागेतच गणपती बसवायचे असतील तर कपाटात बसवायचे का? असा टोलाही त्यांनी लगावला. रस्त्यावरील नमाज बंद केले जात नसल्याने सर्वधर्मीयांना सारखाच न्याय हवा असल्याचे उद्गार त्यांनी काढले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments