Marathi Biodata Maker

बातमी उपयोगाची, SBI ने नियमामध्ये केले आहेत असे बदल

Webdunia
गुरूवार, 20 ऑगस्ट 2020 (10:39 IST)
या आठवड्यात SBIने आपल्या नियमांमध्ये बरेच बदल केले आहेत. हे नियम एटीएम व्यवहार, किमान शिल्लक आणि एसएमएस शुल्काबाबत आहेत. या नियमांमध्ये बँकेने कोणते बदल केले आहेत ते पाहू ...
 
१) स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) १ जुलैपासून एटीएम मधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. जर हे नियम पाळले नाहीत तर ग्राहकांना दंड आकारला जाईल. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार SBI मेट्रो शहरांमधील नियमित बचत खातेधारकांना (सेव्हिंग खातेधारकांना) एटीएममधून एका महिन्यात ८ विनामूल्य व्यवहार करण्याची परवानगी देते. विनामूल्य व्यवहार मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारावर ग्राहकांकडून शुल्क आकारले जाईल.
 
२) SBI ने १८ ऑगस्ट रोजी ग्राहकांना एक मोठी भेट दिली असून आता बचत खातेधारकांकडून एसएमएस शुल्क बँक घेणार नाही.
 
३) SBI ने एटीएममधून दहा हजार रुपयांहून अधिक रोख रक्कम काढण्याच्या नियमातही बदल केला आहे. आता जर तुम्ही SBI एटीएममधून १० हजार रुपयांहून अधिक पैसे काढले तर तुम्हाला ओटीपीची आवश्यकता असेल. बँकेच्या या सुविधेअंतर्गत खातेदारांना SBI च्या एटीएममधून सकाळी ८ ते सकाळी ८ या वेळेत रोकड काढण्यासाठी ओटीपीची आवश्यकता असेल. बँकेची ही सुविधा केवळ खातेदारांना एसबीआय एटीएममध्ये उपलब्ध असेल. आपण इतर कोणत्याही एटीएममधून रोकड काढल्यास आपण ते पूर्वीसारखे सहज काढू शकता. आपल्याला कोणत्याही ओटीपीची आवश्यकता नाही.
 
४) एसबीआय बचत खातेधारकांकडून किमान मासिक रक्कम ठेवत नसल्यासही शुल्क आकारणार नाही आहे. एसबीआयच्या ४४ कोटीहून अधिक बचत खातेधारकांना ही सुविधा मिळेल. यावर्षी मार्चमध्ये SBI ने जाहीर केले की सर्व बचत बँक खात्यांसाठी आवश्यक मासिक किमान शिल्लक ठेवणे अनिवार्य नसणार आहे. याद्वारे बँकेच्या सर्व बचत खातेदारांना शून्य शिल्लक सुविधा मिळू शकेल. याआधी मेट्रो शहरांमधील बचत खातेधारकांना किमान रक्कम म्हणून ३००० रुपये, शहरांमध्ये २००० रुपये आणि ग्रामीण भागात १००० रुपये ठेवणे आवश्यक होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

नवीन

उद्धव गटासोबत विलीनीकरणाचे संकेत देणाऱ्या अब्दुल सत्तार यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनंतर सूर बदलले, म्हणाले.....

घृष्णेश्वर येथे ५ जून रोजी हरिद्वारहून आणलेल्या गंगाजलाने शिवाला अभिषेक केला जाईल; अतिरुद्र महायज्ञाला सुरुवात होणार

नागपूरमधील धर्मांतराचे भीषण रॅकेट: कोलकाता येथील महिलेला ओलीस ठेवून मारहाण, सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

LIVE: हवामान विभागाने कोकणात मुसळधार पाऊस आणि विदर्भात जोरदार वादळाचा इशारा दिला

महाराष्ट्रातील आजचे हवामान: कोकणात मुसळधार पाऊस आणि विदर्भात जोरदार वादळाचा इशारा जारी

पुढील लेख
Show comments