Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अवकाळी पाऊस - केंद्राकडे 7 हजार 28 कोटींची मागणी

Webdunia
सोमवार, 9 डिसेंबर 2019 (10:39 IST)
अवकाळी पावसामुळं राज्यातील 94 हजार हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचं केंद्रीय पथकाच्या पाहणीत आढळलं होतं. या नुकसानीपोटी महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे 7 हजार 28 कोटी रुपयांच्या आर्थिक सहाय्याची मागणी केली आहे.
 
महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांच्या 325 तालुक्यांममध्ये अवकाळी पावसामुळं शेतीचं नुकसान झालंय. यात प्रामुख्यानं भात, कापूस, सोयाबीन, तूर या पिकांवर मोठा परिणाम झाला होता. अवकाळी पावसाच्या संकटाचा एक कोटीहून शेतकऱ्यांना फटका बसला.
 
गेल्याच महिन्यात केंद्रानं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचं पथक राज्यातील अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासी पाठवलं होतं. अप्पर सचिव डॉ. वी. तिरुपुगल यांच्या नेतृत्वाखाली एक पथक औरंगाबाद विभागात, कृषी विभागाचे संचालक डॉ. आर. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथक अमरावती आणि नागपूर विभागात, तर दीना नाथ आणि डॉ. सुभाष चंद्रा यांच्या नेतृत्वाखालील पथक नाशिकमधील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी पाठवलं होतं.
 
या पथकाने अहवाल केंद्रास सादर केला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राला तातडीनं मदतीची अपेक्षा आहे, असं मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

'जर अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर त्यांनी महाविकास आघाडीत परत यावे', उद्धव गटाच्या नेत्याने दिली ऑफर

रायगडमध्ये बसला भीषण अपघात, ३५ प्रवासी जखमी

LIVE: रायगड जिल्ह्यात खाजगी बसला अपघात

PBKS vs LSG: अष्टपैलू कामगिरीमुळे पंजाब जिंकला, किंग्ज दुसऱ्या स्थानावर

KKR vs RR: केकेआरने आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा एका धावेने विजय मिळवला

पुढील लेख
Show comments