Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Cheque देताना चुकूनही या चुका करू नका, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते

Webdunia
मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (15:01 IST)
सध्या बँकिंग फसवणुकीच्या घटना घडणे हे सामान्य झाले आहे.देशातील विविध ठिकाणाहून दररोज बँकिंगच्या फसवणुकीची प्रकरणे बाहेर येत आहे.ही बँकिंग फसवणूक थांबविण्यासाठी देशातील सर्व बँका वेळोवेळी ग्राहकांना सूचना देतात.या साठी रिझर्व्ह बँकेने पुढाकार घेतला आहे.अलीकडील काळात बँकिंग फसवणुकीत चेक किंवा धनादेश फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.चेकमधून फसवणूक टाळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने पॉझिटिव्ह पे प्रणाली सुरु केली आहे.
 
सर्व बँका ही पॉझिटिव्ह पे प्रणाली हळू हळू अवलंबवत आहे.आम्ही आज आपल्याला चेकमधून होणाऱ्या फसवणूकला टाळण्यासाठी काही खबरदारी घेण्यास सांगत आहोत. ज्यांना अवलंबवून आपण आपलं नुकसान टाळू शकता.या साठी आपल्याला काही गोष्टींचे पालन कटाक्षाने करावे लागणार.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 रिक्त धनादेश वर सही करू नका- चेक वर ज्या व्यक्तीला चेक देत आहात,त्याचे नाव,रक्कम,आणि तारीख लिहा.रिकाम्या चेकवर कधीही सही करू नका.चेकवर लिहिण्यासाठी नेहमी पेनचा वापर करा.
 
2 धनादेश नेहमी क्रॉस करा-बँक चेकच्या सुरक्षितेसाठी नेहमी गरज पडल्यास चेक क्रॉस जारी करा.जेणे करून आपण त्याचा गैरवापर होण्यापासून रोखू शकता.
 
3 जागा रिक्त सोडू नका -धनादेश देताना कधीही जागा रिकामी ठेवू नका.नेहमी जागा मोकळी असल्यास रेषा ओढून द्या.धनादेशावर कुठेही सही करू नका.चेक मध्ये काही बदल करायचे असल्यास व्हेरिफाय करण्यासाठीच त्या ठिकाणी सही करा.प्रयत्न हा करा की काही बदल करावा न लागो.
 
4 धनादेश रद्द करताना हे लक्षात असू द्या-चेक कॅन्सिल करताना नेहमी MICR बँड फाडून टाका.आणि संपूर्ण चेक वर कॅन्सिल CANCELअसे लिहा.
 
5 धनादेश ची डिटेल्स आपल्या कडे ठेवा- आपण एखाद्याला चेक दिल्यावर त्याची डिटेल्स आपल्याकडे नमूद करून ठेवा.आपली चेकबुक नेहमी सुरक्षित ठिकाणी ठेवा.
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

तिबेट, बंगालचा उपसागर आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

सोलापूर : कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली

पुढील लेख
Show comments