Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ग्राहकांना दिली स्टेट बँक ऑफ इंडियाने ने महत्त्वाची माहिती

Webdunia
बुधवार, 23 सप्टेंबर 2020 (10:38 IST)
नव्या नियमानुसार कर आकारण्यात येणार असल्याचं त्यात सांगितलं आहे. परदेशात पैसे पाठवल्यास त्यावर कर आकारण्याबाबत केंद्र सरकारने नियम केला आहे. हा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. अशा परिस्थितीत तुम्ही परदेशात राहणाऱ्या मुलांना, नातेवाईकांना पैसे पाठवत असाल तर त्यावर 5 टक्के टीसीएस आकारला जाईल. फायनान्स अॅक्ट 2020 नुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या लिबरलाइज्ड रेमिटेंस स्कीम अंतर्गत परदेशात पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीला टीसीएस द्यावा लागेल.
 
सरकारने या प्रकरणी सूटही दिली आहे. ज्यात परदेशात पाठवण्यात येणाऱ्या सगळ्याच पैशांवर हा कर लागू होणार नाही. जर तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी 7 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी पैसे पाठवत असाल तर टीसीएस लागू होत नाही. तसंच शैक्षणिक कर्ज 7 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर 0.5 टक्के टीसीएस लागू असेल. कोणत्याही टूर पॅकेजसाठी परदेशात पाठवण्यात येणाऱ्या रकमेवर टीसीएस आकारता येणार नाही.
 
यासाठी बनवावा लागला नियम
सरकारला हा नियम आणण्याची गरज का पडली यावर केसीसी ग्रुपचे संस्थापक आणि चेअरमन शरद कोहली यांनी सांगितलं की, परदेशात अनेक प्रकारे टीडीएस कापला जातो. भेट, उपचार, संपत्तीमध्ये गुंतवणूक, नातेवाईकांना मदत, दवाखान्यात जमा करायची रक्कम या सगळ्यावर टीडीएस लावला जात नसे. या सगळ्यावर आरबीआयच्या एलआरएस अंतर्गत टीडीएसमध्ये सूट मिळाली आहे. वास्तवात, कुणीही भारतीय नागरिक आरबीआयच्या एलआरएस अंतर्गत प्रत्येक वर्षी 2.5 लाख डॉलर परदेशात  पाठवू शकतो. या पैशाला टॅक्सच्या अंतर्गत आणण्यासाठी  टीसीएस घेण्याचा नियम बनवला गेला आहे. यामध्ये अनेक प्रकारची सूट दिली गेली आहे. याव्यतिरिक्त सगळ्यांना 5 टक्के टीसीएस देणे अनिवार्य आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख
Show comments