Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विमानतळाचे नियम रेल्वेला होणार लागू, तिकीट नाही ना मग प्रवेश नाही

Webdunia
देशातील  प्रमुख रेल्वे स्टेशनवर तेथे  प्रवेशासाठी तिकिट घेणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे आता तुम्ही रेल्वे स्टेशनवर जाणार असाल तर तुम्हाला तिकिट घेतल्याशिवाय आतमध्ये प्रवेश मिळणारच नाही. जसे विमान तळावर प्रवेश करण्यासाठी तिकिट आवश्यक आहे त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशनवर प्रवेशासाठी तिकिट अनिवार्य असणार आहे. 
 
सोबतच रेल्वे स्टेशनच्या बाजूच्या भिंतीची उंची देखील वाढवण्यात येणार आहे. जेणेकरुन अनाधिकृत पद्धतीने कोणी आत प्रवेश करणार नाही. यात प्रवाशांच्या सुरक्षेकडे रेल्वेने लक्ष देण्याचा निर्णय घेतला असे स्पष्ट केले आहे.रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार रेल्वेतील प्रवाशी, स्टेशनवर असलेले प्रवासी यांची सुरक्षा मुख्य लक्ष आहे. याकरीता आरपीएफ कंमाडोंना विेशेष प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे. 
 
कमांडो रेल्वे स्टेशनच्या प्रवेश द्वारावर सुरक्षा देणार आहेत. देशातील गुजरातच्या गांधीनगर, भोपाळच्या हबीबगंज येथील रेल्वे स्टेशनवर प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे. सोबतच  दिल्ली, आर्थिक राजधानी मुंबई येथील रेल्वे स्टेशनवर देखील याला सुरुवात होणार आहे. सरकारकडून 114 कोटींची तरतूद हे साध्य करण्यासाठी सरकारने 114 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 
 
या अंतर्गत एक असे मशीन लावण्यात येईल की त्यानुसार तिकिट असलेले कर्मचारीच रेल्वे स्टेशनच्या आवारात प्रवेश करु शकतील. तसेच रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूना 3 हजार किलोमीटरची उंच भिंत उभारण्यात येईल. जेणेकरून कोणतीही व्यक्ती आतमध्ये येऊ शकणार नाही.आरपीएफचे महानिर्देशक अरुण कुमार यांनी प्रवाशांची सुरक्षा आमचे मुख्य ध्येय असल्याचे सांगितले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

हवामान विभागाने देशातील १४ राज्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा दिला

पालघर मध्ये केमिकल कारखान्यात गॅस गळती, १० कामगारांची प्रकृती खालावली

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

पुढील लेख
Show comments