Dharma Sangrah

कांदद्याची तेजी सुरूच, शेतकरी राजाला होतोय फायदा

Webdunia
गुरूवार, 21 जून 2018 (17:26 IST)
सर्व साधारण बाजारात  कांद्याच्या किंमतीत कोणतीही वाढ नाही
 
राजस्थान व मध्यप्रदेशात उन्हाचा पारा प्रचंड वाढल्याने साठवणूक केलेला कांदा खराब झाला आहे. परिणामी, नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असून, जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या कांदा तेजीत असल्याचे दिसून येतो आहे. त्याचा परिणाम म्हणून आज दुसऱ्या दिवशी सुद्धा कांदा भाव वाढ कायम असून लासलगाव येथे १५ हजार क्विंटल आवक झाली आहे. यामध्ये जवळपास १०० रु इतकी वाढ दिसून आली असून कमीत कमी ५०० रु. जास्तीत जास्त १३२१ रु. तर सर्व साधारण ११७५ रु भाव लासलगाव येथे मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला थोडासा दिलासा मिळाला आहे.
 
मात्र या भाव वाढीमुळे कोणत्याही प्रकारे खुल्या बाजारपेठेत कांदा भाव वाढणार नाही असे तज्ञ सांगत असून, सोशल मिडीयावर फिरत असलेल्या कांदा दर बाबत विश्वास ठेवू नये असे आव्हान बाजार समिती करत आहेत.
 
या आठवड्याच्या सुरुवातीच्या लासलगाव येथे  पहिल्याच दिवशी सोमवारी सरासरी ९२० रुपये इतका होता. तर मंगळवारी सोमवारच्या भावाच्या तुलनेत १०० रुपयांनी वाढ दिसून आली होती. सरासरी १०५० रुपये प्रति क्विंटल, तर कमाल दरात १३०० रुपयांच्या आसपास पोहचला होता. त्यामुळे सध्या कांदा तेजीत असून,त्यामुळे शेतकरी वर्गाला आर्थिक लाभ होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

पश्चिम रेल्वे १५० विशेष गाड्या चालवणार, बहुतांश मुंबईहून सुटणार

LIVE: रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला

MI vs KKR: मुंबई इंडियन्सचा सामना घरच्या मैदानावर केकेआरशी होईल

मुंबई लोकल ट्रेनमध्ये १५ डबे असणार? शिंदे-ठाकरे गटाच्या खासदारांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना आवाहन केले

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील २०११ पर्यंतची अतिक्रमणे नियमित केली जाणार

पुढील लेख
Show comments