Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'या' 3 बँकांना ठोठावला दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

Webdunia
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2023 (20:51 IST)
मुंबई : काही दिवसांपूर्वीच आरबीआयने एसबीआय आणि इंडियन बँकेसह सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांवर दंड ठोठावला होता. आरबीआयने सांगितले की, एसबीआयला 1.3 कोटी रुपये, इंडियन बँकेला 1.62 कोटी रुपये आणि पंजाब अँड सिंध बँकेला 1 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला होता. अशाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता बँकिंग नियमांच्या उल्लंघनावर कठोर भूमिका घेत आहे. RBI ने काही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल देशातील तीन मोठ्या बँकांना दंड ठोठावला आहे.
 
सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या SBI बँकेला कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर, RBI ने तीन सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे. यावेळी आरबीआयने सारस्वत सहकारी बँक लिमिटेड, बसेन कॅथोलिक सहकारी बँक लिमिटेड आणि राजकोट नागरी सहकारी बँक लिमिटेड यांना दंड ठोठावला आहे.
 
सारस्वत सहकारी बँकेला 23 लाखांचा दंड
बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या तरतुदी आणि आरबीआयने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने सारस्वत सहकारी बँक लिमिटेड, मुंबईला 23 लाख रुपयांचा दंड ठोठावला. आरबीआयकडून सांगण्यात आले की सारस्वत सहकारी बँकेने बीआर कायद्यातील तरतुदी आणि त्याअंतर्गत जारी केलेल्या आरबीआयच्या निर्देशांचे उल्लंघन केले आहे.
 
'या' दोन बँकांनाही दंड ठोठावला
याशिवाय, कलम 20 च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल वसई, महाराष्ट्रातील बेसिन कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 25 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. बेसिन कॅथोलिक सहकारी बँक तिच्या मालकीच्या एका संचालक/फर्मला अनेक असुरक्षित कर्जे दिल्याबद्दल दोषी आढळली आहे.
 
रिझर्व्ह बँकेने 'ठेवीवरील व्याज दर' यासंदर्भात आरबीआयने जारी केलेल्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल राजकोट नागरी सहकारी बँक लिमिटेड, राजकोटला 13 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
 
रिझर्व्ह बँक वेळोवेळी नियमांचे पालन न केल्यामुळे बँकांवर दंड आकारते. मात्र त्याचा बँक खातेदारांवर कोणताही परिणाम होत नाही. बँक खातेदारांच्या रोख रक्कम काढण्यावर किंवा जमा करण्यावर कोणतेही निर्बंध येत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती

Vat Savitri Vrat 2025 वट सावित्री व्रत कधी आहे, जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि विधी

आरोग्यवर्धक सीताफळची पाने रक्ताची कमतरता दूर करून हाडे मजबूत करते

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणती डाळ खाणे सर्वात योग्य ठरेल?

Things to Avoid in Kitchen तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तू तर नाही? असतील तर लगेच बाहेर काढा

सर्व पहा

नवीन

सोलापूर : ९ वर्षांच्या मुलीने अवैध संबंध पाहिले, क्रूर वडिलांनी मुलीची हत्या करून गाडले

LIVE: पनवेलमध्ये कावीळचा प्रादुर्भाव

दहशतवादाविरुद्ध एकत्र येण्याची वेळ आली आहे, राजकीय टीका नंतर म्हणाल्या सुप्रिया सुळे

होय! मला माहिती आहे... ठाकरे-पवार ब्रँड नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहे, राज ठाकरेंचे मोठे विधान

ठाण्यात कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू; रुग्णालय सतर्क स्थितीत

पुढील लेख
Show comments