Marathi Biodata Maker

रिलायन्स जिओचा 3 हजार कोटींचा नफा, फक्त अडीच वर्षांत 30 कोटी ग्राहकांची संख्या ओलांडली

Webdunia
शनिवार, 20 एप्रिल 2019 (17:15 IST)
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने 2018-19 मध्ये 2,964 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे युनिट रिलायन्स जिओने सुमारे अडीच वर्षांपूर्वीच देशातील दूरसंचार क्षेत्रात पाऊल टाकले होते आणि फक्त 30 महिन्यात 30 कोटी ग्राहकांची संख्या ओलांडली आहे.
 
गुरुवारी कंपनीच्या घोषित परिणामानुसार गेल्या 31 मार्च रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात त्यांना 15,102 कोटी रुपयांच्या कर पूर्वी नफा झाला आहे. 1 वर्षा पूर्वीच्या तुलनेत सव्वा दोन वेळा जास्त होते. ऑपरेटिंग मार्जिन 38.9 टक्के राहिली. संपलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत रिलायन्स जिओचा कर पूर्वीचा नफा 4,053 कोटी रुपये होता, आणि जे तिसऱ्या तिमाहीत 13.4 टक्के जास्त आहे. 
 
कंपनीच्या इतर व्यवसायात देखील अंबानीने मजबूत वाढीसाठी अभिनंदन करताना म्हणाले की मला रिलायन्स संघाचा अभिमान आहे. या यशात रिलायन्स संघाचा कठोर परिश्रम आणि समर्पण आहे. रिलायन्स जिओचा 2018-19 मध्ये प्रति ग्राहक महसूल (एआरपीयू) 126.2 रु राहिलं आहे. चवथ्या तिमाहीत जिओ ग्राहकांनी सरासरी दरमहा 10.9 जीबी डेटा वापरला आणि 823 मिनिटे व्हॉईस कॉल केली. तसेच याच तिमाहीत 2.7 कोटी ग्राहक कंपनीशी जुळले. या काळात ग्राहकांनी 956 कोटी जीबी वायरलेस डेटा वापरला आणि एकूण 72,414 कोटी मिनिटे गोष्टी केल्या. 
 
त्याचवेळी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (टीआरएआय) च्या ताज्या आकडेवारीनुसार वायरलेस ग्राहकांच्या बाजारात जिओचा भाग फेब्रुवारीच्या अखेरीस 25.11 टक्के झाले. या महिन्याच्या दरम्यान कंपनीने 77,93,440 ग्राहक जोडले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments