Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

"ऊसाला पाणी जास्त लागतं, त्याऐवजी शेतकऱ्यांनी..."; अजित पवारांचा सल्ला

Webdunia
शनिवार, 7 मे 2022 (08:12 IST)
पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या एका वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती. ऊसाचं पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेल्या सल्ल्याने त्यांना टीकेला सामारं जावं लागलं होतं. त्यानंतर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील ऊसाबद्दल आपलं व्यक्त केलं आहे. ऊसाला पाणी अधिक लागत असल्यानं त्याऐवजी सोयाबीन किंवा इतर चांगले उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांना वळवण्याची गरज आहे. कृषी विभागानं त्यादृष्टीनं प्रयत्न करावेत असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनीही ऊस हे आळशी लोकांचं पिक असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता अजित पवार यांनीही असंच विधान केल्यानं त्यांच्या या विधानावर नेमक्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
 
अजित पवार यांनी आज खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीनंतर ही माहिती दिली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी आणि कृषी निविष्ठांचा पुरेसा पुरवठा करावा, असे निर्देश खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत संबंधितांना दिले. ऊस तोडणीसाठी मनुष्यबळ कमी असल्यानं गाळप बंद झालेल्या कारखान्यांकडील हार्वेस्टर इतर क्षेत्रातील ऊसतोडणीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत विचार करण्यात येत आहे असंही अजित पवार यांनी सांगितला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पुणे: विहिरीत पडलेला बिबट्याच्या पिल्लूला वाचवल्यानंतर जंगलात सोडले

बुलढाणा : लग्नात तलवार घेऊन नाचले, शिवसेना युबीटी आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल

मुस्लिम अभिनेते आणि अभिनेत्रींच्या बहिष्कारावर संजय निरुपम यांनीही प्रतिक्रिया दिली

LIVE: मुंबई गुन्हे शाखेने ४ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले

ट्रम्प यांच्या दाव्यावर संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारवर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments