Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Asia Cup: कपिल देव यांनी आशिया चषकापूर्वी टीम इंडियाला दिला इशारा

Webdunia
रविवार, 27 ऑगस्ट 2023 (10:17 IST)
आशिया चषक 30 ऑगस्टपासून सुरू होणार असून भारतीय संघ 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. दुखापतीतून सावरत असलेल्या श्रेयस अय्यर आणि केएल राहुलला टीम इंडियाने स्थान दिले आहे. हे दोन्ही खेळाडू बऱ्याच कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहेत. राहुल मात्र हाताच्या दुखापतीने त्रस्त असून सुरुवातीच्या काही सामन्यांना तो मुकणार आहे. दरम्यान, भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी अय्यर आणि राहुलच्या पुनरागमनावर आनंद व्यक्त केला आहे. याशिवाय त्यांनी  टीम इंडियालाही इशारा दिला आहे. 
 
कपिल देव यांचे म्हणणे आहे की,आशियाकपच्या पूर्वी सर्व खेळाडूंची मैदानी चाचणी व्हायला हवी.  कोणत्याही खेळाडूचा फिटनेस तपासण्यासाठी आशिया चषक ही सर्वोत्तम स्पर्धा असल्याचे विश्वचषक विजेत्याला वाटते. कपिल देव म्हणाले की विश्वचषक अगदी जवळ आला आहे आणि अशा परिस्थितीत सर्व खेळाडूंची फिटनेस चाचणी व्हायला हवी.
 
दुखापतीतून परतल्या खेळाडूंसाठी ते म्हणाले, “सर्व खेळाडूंना अजून संधी मिळालेली नाही. तो थेट विश्वचषकात खेळला आणि पुन्हा जखमी झाला तर काय होईल याची कल्पना करू शकता का? यासाठी संपूर्ण टीम का सहन करणार.
ते म्हणले, खेळाडूंना आशिया चषक मध्ये  कमी फलंदाजी आणि गोलंदाजी करण्याची संधी असेल. यामुळे त्यांना पुन्हा लयीत येण्याची आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याची संधी मिळेल. विश्वचषकादरम्यान कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली तर ती खूप वाईट गोष्ट असेल. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी आणि ते तंदुरुस्त असतील तर त्यांची विश्वचषकासाठी निवड करावी.
 
आशिया चषक 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पाकिस्तानमध्ये आणखी चार श्रीलंकेत नऊ सामने होणार आहेत. भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. भारत अ गटात आहे. पाकिस्तान आणि नेपाळही त्याच्यासोबत आहेत. तर ब गटात बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान आहेत. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर-4 फेरीत प्रवेश करतील. तेथून दोन संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. 
 





Edited by - Priya Dixit    
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

सर्व पहा

नवीन

काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विनेश फोगटने सोडली रेल्वेची नौकरी राजीनामा दिला

या तारखेपासून WTC 2025 फायनल लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर होणार

मोहम्मद शमीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत मोठा खुलासा केला

PAK vs BAN: बांगलादेशने पाकिस्तानचा पराभव सहा गडी राखून केला,इतिहास रचला

आयुष बडोनी, 19 षटकार आणि सर्वात वेगवान शतक ठोकणारा फलंदाज बनला

पुढील लेख
Show comments