यावर्षाच्या अखेरीस आयसीसीच्या कार्यक्रमानुसार भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका खेळवण्याचा प्रस्ताव आहे.
पण भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोएल यांनी पाकिस्तान बरोबर क्रिकेट मालिकेची शक्यता फेटाळून लावली आहे.
क्रिकेट आणि दहशतवाद एकचवेळी चालू शकत नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. येत्या चार जूनला इंग्लंडमध्ये एजबेस्टॉनवर दोन्ही देशांमध्ये सलामीचा सामना रंगणार आहे.