Festival Posters

मोहाली कसोटीत भारताने इंग्लंडला आठ विकेटने पराभव केला

Webdunia
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016 (15:50 IST)
भारताने मोहाली क्रिकेट कसोटी सामन्यात चवथ्या दिवशी इंग्लंडचा आठ विकेटने पराभव करून कसोटी मालिकेत आपला कब्जा केला आहे. या विजयानंतर भारतीय संघ पाच सामन्याच्या मालिकेत 2-0ने पुढे निघाला आहे. भारताच्या क्रिकेट इतिहासात प्रथमच सातव्या क्रमांक किंवा त्याखाली खेळणाऱ्या तीन खेळाडूंनी (आश्विन, जडेजा व जयंत) एका डावात अर्धशतके झळकावण्याची कामगिरी केली. काल मोहाली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या तळाच्या फलंदाजांनी चिवट फलंदाजी करताना भारताला 134 धावांची आघाडी मिळवून दिली. भाराताकडून जाडेजाने 90 धावांची खेली केली. तर अश्विन 72 आणि जयंतने 52 धावांची खेळी केली. भारतातर्फे अशी कामगीरी प्रथमच झाली आहे. तळाच्या फलंदाजांनी 3 शतके करण्याची कामगिरी अश्विन, जाडेजा आणि जयंत यादव यांच्या नावावर झाली आहे. 
 
तिसऱ्या दिवशी अश्विन जाडेजाने केलेल्या ९७ दावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने सोमवारी तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात ४१७ धावांची मजल मारली आणि पहिल्या डावात १३४ धावांची आघाडी घेतली. जडेजाने उपाहारानंतर ख्रिस व्होक्सच्या एका षटकात चार चौकार लगावले. त्यानंतर आदिल राशिदच्या गोलंदाजीवर षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात जडेजा लाँग ऑन सीमारेषेवर तैनात व्होक्सकडे झेल देत माघारी परतला. उमेश यादवने जयंतसोबत ३३ धावांची भागीदारी करीत भारताला ४०० चा पल्ला ओलांडून दिला. 
 
जडेजाची यापूर्वीची सर्वोच्च खेळी ६८ धावांची होती. ही खेळी त्याने २०१४ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध साकारली होती. जयंतने आपली उपयुक्तता सिद्ध करताना मालिकेत सलग तिसऱ्यांदा भारताला ४०० चा पल्ला ओलांडून दिला. भारताविरुद्ध पाहुण्या संघाने पहिल्या डावात ६५ पेक्षा अधिक धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर कधीच विजय साकारलेला नाही. गेल्या ५२ वर्षांत १९६४ मध्ये बॉब सिम्पसनच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात ६५ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर भारताचा पराभव केला होता. या अगोदर भारताने आपल्या पहिल्या डावात 417 धावा काढल्या होत्या. इंग्लंडचा पहिला डाव 283 धावांवर संपुष्टात आला होता.   
सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, हरलीन देओलला स्थान नाही; फुलमाली आणि नंदिनी यांचा संघात समावेश

SRH vs KKR : आयपीएल २०२६ हंगामातील ४५ वा साखळी सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात

CSK vs MI: मुंबई इंडियन्सचा या हंगामातील ७वा पराभव, चेन्नईने घरच्या मैदानावर दणदणीत विजय नोंदवला

महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय महिला संघाची घोषणा

CSK vs MI : सीएसके घरच्या मैदानावर मुंबईचा सामना करेल

पुढील लेख
Show comments