Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिखर, विराटच्या खेळीने भारत विजयी

Webdunia
फिरकीपटूंनी केलेल्या शानदार गोलंदाजीनंतर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांनी केलेल्या तुफानी फलंदाजीच्या मदतीने भारताने पहिल्या एकदिवशीय सामन्यात श्रीलंकेवर 9 गड्यांनी दणदणीत विजय मिळविला. धवनने फक्त 90 चेंडूत 20 चौकार आणि 3 षटकार ठोकत नाबाद 132 धावांची खेळी केली. कर्णधार विराट कोहलीनेही 10 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 70 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली. भारताने फक्त 28.3 षटकांत श्रीलंकेने दिलेले 217 धावांचे आव्हान पार केले.
 
रांगिरी आंतरराष्ट्रीय मैदानावर रविवारी झालेल्या 5 एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत श्रीलंकेला 43.2 षटकांत 216 धावांवर रोखले. त्यानंतर 217 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी सावध सुरूवात केली. मात्र, भारताची पहिली विकेट 23 धावांवर गमाविली. सलामीवीर रोहित शर्मा 4 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर फॉर्मात असलेल्या शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांनी तुफानी फलंदाजी करत भारताला एकतर्फी विजय मिळवून दिला. रोहित बाद झाल्यानंतर शिखर आणि विराट यांनी श्रीलंकेला एकही यश मिळू दिले नाही. शिखर धवनने नाबाद 132 आणि विराट कोहली यांनी नाबाद 82 धावांची खेळी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

केएल राहुल आयपीएलमध्ये खेळताना दिसणार

DC vs MI : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 29 धावांनी पराभव केला

Ranji Trophy 2024:मुंबईने तामिळनाडूचा पराभव करत 48व्यांदा रणजी ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली

संजू सॅमसनने पूर्ण केले अपंग मुलाचे स्वप्न

पुढील लेख
Show comments