Dharma Sangrah

टीम इंडियामध्ये झाली अखेर सुरेश रैनाची एन्ट्री

Webdunia
सोमवार, 5 मार्च 2018 (11:23 IST)
दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक विजय मिळवत टीम इंडिया मायदेशी परतली. टेस्ट सीरिज गमावल्यानंतर टीम इंडियाने वन-डे सीरिज आणि टी-२० सीरिज आपल्या नावावर केली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियात सुरेश रैना याचं खूप दिवसांनी पुनरागमन झालं. यासोबतच त्याने टी-२० सीरिजमध्ये स्वत:चं कर्तुत्व सिद्ध केलं.
 
सुरेश रैनाने २७ बॉल्समध्ये ४३ रन्स करत तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये विजय मिळवून देण्यास मदत केली. टीम इंडियाने टी-२० सीरिज २-१ ने आपल्या नावावर केली होती. ३ मॅचेसच्या सीरिजमधील शेवटच्या मॅचमध्ये सुरेश रैनाला ‘मॅन ऑफ द मॅच’ चा पुरस्कार मिळाला.
 
टीमचे कोत रवि शास्त्री यांनीही सुरेश रैनाच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. नुकतचंएका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत रवि शास्त्री यांनी म्हटले, “सुरेश रैना खूपच अनुभवी खेळाडू आहे आणि त्याचा अनुभव काय करु शकतो हे त्याने दाखवून दिलं आहे.” “अनेक दिवस टीममधून बाहेर असलेले खेळाडू आपली टीममध्ये जागा निर्माण करण्याचा पाठलाग करत असतात. पण सुरेश रैनाने आपला परफॉरमन्स दाखवला आहे. सुरेश रैनाने अशी बॅटिंग केली की तो टीममधून कधी बाहेर नव्हताच. त्याची खेळी पाहून खूपच चांगलं वाटलं” असेही रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Hardik Pandya flag controversy गर्लफ्रेंडसोबतच्या व्हिडिओमुळे वाद, पुण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार

14 मार्च रोजी मसुरीमध्ये कुलदीप वंशिकासोबत लग्न करणार

IPL 2026 Schedule: आयपीएल चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, आरसीबी त्यांचा पहिला सामना बेंगळुरूमध्ये खेळणार

अभिषेकचे नंबर १ रँकिंग धोक्यात, इशान किशन अगदी जवळ

PAK vs BAN: बांगलादेशने सामना ८ विकेट्सने जिंकला, पाकिस्तानचा पराभव

पुढील लेख
Show comments