Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टीम इंडियाने श्रीलंकेचा 62 धावांनी पराभव करत T20I क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा विक्रम मोडला

Team India broke Pakistan's record in T20I cricket by defeating Sri Lanka by 62 runs टीम इंडियाने श्रीलंकेचा 62 धावांनी पराभव करत T20I क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा विक्रम मोडलाMarathi Cricket News In Webdunia Marathi
, गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (23:26 IST)
भारतीय संघाने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी केली आहे. भारतीय संघाने एकप्रकारे आपलाच विक्रम मोडीत काढला आहे. लखनौच्या मैदानावर भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना जिंकताच, संघाने सलग दहावा T20 आंतरराष्ट्रीय सामना जिंकला. अशा प्रकारे भारताने पाकिस्तानचा विक्रम मोडीत काढला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानने सलग 9 सामने जिंकले होते.
 
भारतीय संघ शेवटचा T20 विश्वचषक 2021 मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पराभूत झाला होता. त्यानंतर भारतीय संघाने सलग 10 सामने जिंकले आहेत. 2021 च्या T20 विश्वचषकात भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाचा पराभव केला आणि त्यानंतर T20I मालिकेत न्यूझीलंडचा 3-0 ने पराभव केला. 
 
भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 3-0 ने विजय मिळवला आणि सलग 9 टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याच्या त्यांच्या स्वत:च्या विक्रमाची बरोबरी केली, तर श्रीलंकेला हरवून भारताने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 सामने जिंकण्याची पहिलीच वेळ आहे. लखनौ येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 62 धावांनी पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
 
रोहित शर्माने टीम इंडियाची कमान नियमितपणे हाती घेतल्यापासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा पराभव झालेला नाही. 2021 च्या T20 विश्वचषकानंतर रोहित शर्माला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आणि तेव्हापासून त्याने भारताला सलग 10 विजय मिळवून दिले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देशातील सर्वात अनोखे गाव, प्रत्येक घरात साप पाळले जातात