Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय संघ विराटवर अवलंबून नाही

Webdunia
गेल्या दीड-दोन वर्षांपासून सातत्याने धावा करणारा भारतीय कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म सध्या हरवला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सुरू होत असलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील भारतीय संघाच्या भवितव्याबद्दल अनेकांना चिंता वाटत आहे. मात्र भारतीय संघात अनेक गुणवान खेळाडू असून विराटच्या अपयशाची भरपाई करण्याची क्षमता त्यांच्यात असल्याची ग्वाही भारताचे प्रुडेन्शियल विश्‍वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांनी दिली आहे.
 
दिल्लीतील मॅडम तुसॉ वॅक्‍स म्युझियम येथे कपिल देव यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण आज करण्यात आले, त्या वेळी कपिल देव बोलत होते. विराट कोहलीच्या ढासळत्या फॉर्मचा भारतीय संघाच्या कामगिरीवर किती परिणाम होईल, असे विचारले असता ते म्हणाले की, ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला कसोटीपूर्वीही हाच प्रश्‍न विचारण्यात येत होता. प्रत्यक्षात काय घडले हे आपण पाहिलेच. विराट अपयशी ठरला तर काय होईल असे विचारून आपण संघातील अन्य खेळाडूंवर अन्याय करीत आहोत.
 
दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाल्यास विराट हा खूप मोठा खेळाडू आहे. त्यालाही आपल्या अपयशाची जाणीव आहे आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी त्याचाही प्रयत्न चालू असेलच. कधी आणि कसे खेळायचे हे त्याला बरोबर माहीत आहे, असे सांगून कपिल देव म्हणाले की, गेल्या पाच वर्षांपासून भारतीय संघाची कामगिरी चांगलीच होत आहे. त्यांच्यात चॅम्पियन्स करंडक जिंकण्याची क्षमता निश्‍चितच आहे. परंतु स्पर्धेदरम्यान कागदावरील नियोजन मैदानावर प्रत्यक्षात उतरविण्यात त्यांना कितपत यश मिळते, यावर बरेच काही अवलंबून आहे.
 
कोणत्यीाह एका गोलंदाजावर संघ अवलंबून नसतो, असे सांगून कपिल देव म्हणाले की, एका गोलंदाजाने कितीही चांगली कामगिरी केली तरी तो एकटा जिंकत नसून संपूर्ण संघ विजयी होत असतो. सर्व खेळाडूंनी एकत्रितपणे सांघिक कामगिरी करण्याकडे लक्ष दिल्यास जिंकण्याची शक्‍यता वाढते. माझ्या मते आजचे युवा खेळाडू आमच्यापेक्षा अधिक व्यावसायिक आहेत. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी केलेल्या संघनिवडीवर टीका करणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी युवा खेळाडू निवडले असते, तर अनुभवींना का वगळले असे तुम्ही विचारले असते. माझे मत वेगळे असू शकेल. परंतु त्यामुळे संघनिवडीवर टीका करणे योग्य नाही, असे त्यांनी नमूद केले.
सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

केएल राहुल आयपीएलमध्ये खेळताना दिसणार

DC vs MI : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 29 धावांनी पराभव केला

Ranji Trophy 2024:मुंबईने तामिळनाडूचा पराभव करत 48व्यांदा रणजी ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली

संजू सॅमसनने पूर्ण केले अपंग मुलाचे स्वप्न

पुढील लेख
Show comments