Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आयपीएल भरविण्यासाठी आता परवानगी घ्यावी लागेल

Webdunia
आयपीएलचा तेरावा हंगाम 15 एप्रिलर्पंत पुढे ढकलण्यात आलेला असला तरी ही स्पर्धा भरविण्यासाठी बीसीसीआयला पुन्हा केंद्र सरकारच्या क्रीडामंत्रालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.
 
भारताचे क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी या संदर्भात एक मोठे विधान केले आहे. आयपीएल 29 मार्चपासून सुरु होणार होती. पण 'कोरोना' व्हायरसचा प्रसार पाहता आयपीएल 15 एप्रिलर्पंत पुढे ढकलण्यात आली आहे. पण जर बीसीसीआयला आयपीएल खेळवाची असेल तर त्यांना क्रीडा मंत्रालयाच्या   परवानगीशिवाय भारतात खेळवता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 
क्रीडा मंत्र्यांनीच आयपीएलबाबत मोठे भाष्य केल्यामुळे या स्पर्धेचे औत्सुक्य वाढले आहेत. क्रीडा मंत्र्यांनी जर परवानगी दिली नाही तर बीसीसीआयला आयपीएल भारतात भरवता येणार नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. 
 
आयपीएलबाबत क्रीडा मंत्री म्हणाले की, भारत सरकार 15 एप्रिलला 'कोरोना' व्हायरसबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणार आहे. त्यानुसार सर्वांनाच काम करावे लागेल. जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, हे सर्वांचेच म्हणणे आहे. पण ही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर झाल्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
 
क्रीडा मंत्री पुढे म्हणाले की, बीसीसीआय ही फक्त क्रिकेट हा खेळ पाहते, अन्य खेळ नाही. सध्या ऑलिम्पिकचा मुद्दाही ऐरणीवर आहे, जे बीसीसीआय पाहत नाही. आम्हाला सर्वच खेळ पाहावे लागतात. हा मुद्दा नागरिकांच्या सुरक्षेबाबत आहे. एका सामन्याला हजारो प्रेक्षक येत असतात. त्यामुळे हा प्रश्न आता फक्त खेळाचा उरलेला नाही तर हा मुद्दा आता देशाचा झालेला आहे. 
 
भारत सरकारने काही नियम काढले आहेत. त्यानुसार 11 मार्चपासून विदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा देण्यात आला नाही. त्यामुळे सधच्या घडीला आयपीएल सुरु झाली तरीविदेशी खेळाडूंचे काय करायचे, हा प्रश्न बीसीसीआय आणि आयपीएलच्या प्रशासकीय समितीपुढे नेहमीच असेल. आता आयपीएल 15 एप्रिलर्पंत पुढे ढकलली आहे. पण त्यावेळी तरी विदेशी क्रिकेटपटूंना व्हिसा मिळणार का, हा प्रश्न बीसीसीआयसाठी महत्त्वाचा असेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती

Vat Savitri Vrat 2025 वट सावित्री व्रत कधी आहे, जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि विधी

आरोग्यवर्धक सीताफळची पाने रक्ताची कमतरता दूर करून हाडे मजबूत करते

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणती डाळ खाणे सर्वात योग्य ठरेल?

Things to Avoid in Kitchen तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तू तर नाही? असतील तर लगेच बाहेर काढा

सर्व पहा

नवीन

GT vs LSG : आयपीएल 2025 हंगामातील 64 वा लीग सामना गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अंडर-19 संघाची घोषणा

MI vs DC: आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले, दिल्ली कॅपिटल्सचे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न भंगले

MI vs DC: दिल्लीला हरवून, मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२५ च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ बनला

IPL 2025 : आज मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार, रोहित शर्माला मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी

पुढील लेख
Show comments