Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संगत : मातीचं मडकं जगण्याचा मार्ग बदलत असेल तर...

Webdunia
सोमवार, 22 मार्च 2021 (11:55 IST)
एक साधू रस्त्याने चालले असताना त्याना खूप तहान लागली, पुढे गेले तर एका कुंभाराच घर लागले, साधू तिथे गेले आणि पाणी मागितले त्यानेही त्या साधूंना आदर पूर्वक नमस्कार करून पाणी दिले, पाणी पीत असताना अचानक त्यांच लक्ष बाजूस ठेवलेल्या मडक्यावर गेलं, एका बाजूला भला मोठा मडक्यांचा ढीग लावला होता पण एक मडकं वेगळं ठेवलं होतं, त्या साधूंनी त्याला विचारलं का रे बाबा इतकी मडकी एका बाजूस आणि ते एकंच मडकं वेगळ का रे बाबा ठेवलं आहेस? 
 
तेव्हा तो म्हणाला, महाराज ते मडकं खराब आहे.. त्याला गळती लागली आहे.. आणि म्हणुन कोणी ते घेत नाहीए. म्हणून वेगळं ठेवलं आहे.
 
साधूंनी त्याच्याकडे त्या मडक्याची मागणी केली, तो कुंभार म्हणाला महाराज अहो हव असेल तर चांगलं मडकं घेऊन जा.. फुटकं मडकं नेऊन काय फायदा?
 
ते म्हणाले देणार असशील तर हेच दे नाहीतर चाललो मी, नाईलाजस्तव त्याने ते मडकं त्यांना देऊन टाकलं.
 
त्या साधूंनी त्या मडक्याला स्वछ धुतल्यानंतर आणून आपल्या मंदिरातील शिवलिंगावर बांधून ठेवलं. परिणामस्वरुप काल पर्यंत कोणा एका कोपर्‍यात खितपत पडलेलं निरुपयोगी ते मडकं आज साधूंच्या च्या सहवासाने, संत समागमाने देव कार्य करू लागलं. देवाच्या सानिध्यात भक्त यायची तेव्हा त्या शिवशंकरांच्या पिंडीला नमस्कार करताना त्या मडक्याला ही डोकं लावायचे आणि त्यांच मन प्रसन्न व्हायचं.
 
जर एक मातीचं मडकं एका साधुच्या सहवासात येऊन त्याच्या जगण्याचा मार्ग बदलत असेल, क्षणात ते कुठच्या कुठे पोचत असेल तर आपण तर मनुष्य आहोत. मग आपण जर गुरूंच्या / संतांच्या/ चांगल्या व्यक्तींच्या / सज्जनाच्या सहवासात राहू ..तर काय आपलं जीवन सुंदर घडणार नाही का ?

- सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

नितीन गडकरी यांच्या विरोधातील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना फटकारले

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; शासकीय सेवा आता पूर्णपणे डिजिटल होणार

पश्चिम रेल्वेने तिकीट न वापरता प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करत ८३.२५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला

महाराष्ट्रात डॉक्टरांचा इशारा; मागण्या पूर्ण न झाल्यास आपत्कालीन सेवाही बंद केल्या जातील

LIVE: महाराष्ट्रात डॉक्टरांचा इशारा;मागण्या पूर्ण न झाल्यास आपत्कालीन सेवाही बंद केल्या जातील

पुढील लेख
Show comments