Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दशदिशा भूपाळी म्हणती

Webdunia
सोमवार, 30 मार्च 2020 (15:42 IST)
होम क्वॉरेंटाइन मुळे जणू आपलाही तिसरा नेत्र उघडल्याचा भास झाला आणि निसर्गाकडे बघण्याची नवी दृष्टी लाभली. पहाटे उठून गच्चीत जाऊन बघावे तर काय? माझे सुस्वर स्वागत झाले...... 
 
फूल पल्लव कली कालियन करत स्वागतम !
पंछी मधुर सबद कहत करत स्वागतम !
कोयल मधु कुऊक करत 
भ्रमर करिती गुंजारव !
पवन चलत सनन बहत करत स्वागतम !
 
काय नव्हते तेथे ? निसर्गाच्या विविध रुपांचे दर्शन होते. निरभ्र निळ्याशार आकाशाचे मनोहारी दर्शन, कोकीळेचे साद घालणे ऐकू आले. पोपटांचे थवे आंब्याच्या झाडावर बसून बाळ कैर्यांचा आस्वाद घेत होते. अनेकविध पक्षांची किलबिल कधीही न पाहिलेल्या पक्षांचे दुर्लभ दर्शन झाले. 
मला आवडणारा भारद्वाज पक्षी त्याचे तांबूस पिंगट रंगाचे मऊ मखमली पंख पसरत गुंजासारख्या किरमीजी रंगाच्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत ऐटीत कठड्यावरून चालत जात होता. मग क्रुप क्रुप क्रुप असा आवाज करत झाडाच्या फांदीवर जाऊन बसला त्याला प्रत्युत्तर ही कुठूनसे येत होते.
आपण जणू एखाद्या अभयारण्याची सैर करतो आहोत असा भास होत होता. अश्या विविध पक्षांचे आवाज आता भर दिवसाही ऐकू येतात. दुर्लभ झालेल्या चिऊताई पण दिसू लागल्यात हल्ली. ही मंडळी पोल्यूशन पासून तात्पुरती सुटका झाल्याचा आनंद तर मनवत नसतील ? मग लक्षात आले निसर्ग चुकत नाही आपल्यालाच कुठे ही दृष्टी असते.
 
'कुठे शोधिसि रामेश्वर अन कुठे शोधीसि काशी
हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी'
 
निसर्गाची श्रीमंती तर विनामूल्य आपल्या दारात अवतरली आहे फक्त नजर शाबूत हवी.....

लेखन - स्नेहल खंडागळे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

LIVE: आज १६.९६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ७,००० कोटी रुपये हस्तांतरित केले जातील

भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे दुःखद निधन

गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूमुळे २२ मुलांचा मृत्यू; हा विषाणू किती धोकादायक आहे?

मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्याने घेतला ठाणे TDRF जवानाचा बळी

वेलंकन्नी उत्सवानिमित्त मुंबईहून चार विशेष गाड्यांची घोषणा; बुकिंग बद्दल जाणून घ्या...

पुढील लेख
Show comments