Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अतिपुत्र प्रेमापोटी धृतराष्ट्र अंधळा.....

sharad pawar ajit pawar
, सोमवार, 10 जुलै 2023 (08:31 IST)
सद्य राजकिय परिस्थिती पहाता भविष्यातही हीच परिस्थिती राहील हे मात्र सांगता येणार नाही कारण काही गणितांसाठी अन भविष्यातील गरज बघता झालेली ही राजकिय स्थिती आहे.कारण भाजपच्या चाणाक्यनितीला तोड नाहीच अन मतदारांचाही पुर्ण विचार करुनच टाकलेला डाव पेच नक्कीच महाराष्ट्रहीताचा अन फायद्याचा असणार आहे.भविष्यात समान नागरिक कायदा येऊ पाहत आहे. अन भाजपाच्या जाहीरनाम्यातच वचनपुर्तीच भाजप पुर्ण करतोय.बर्याच गोष्टींसाठी भाजपाचे चाणाक्य लोकहितपाहूनच निर्णय घेतात.377 हटवला तेव्हा मेहबूबा मुक्ती बरोबर होत्या तर आता बरेच छोटे मोठे राजकिय पक्ष एकत्र भाजपला येऊन मिळत आहेत.असेच वचनपुर्ती भाजप ठाम पणे पुर्ण करत आलाय. आजही काही पावलं त्याच दिशेने वळताना दिसत आहे.अशा भाजपाई चाणाक्यांसमोर कुणीच जाणते टिकू शकत नाही.
 
पवारांची राष्ट्रवादी असो शिवसेना असो सर्वच भाजपाई समोर हरले आहेत.सत्तेच्या मोहापाई अन भाजप चाणाक्य वचन पुर्तिच्या महत्वाकांक्षेने होऊ घातलेल्या या डावपेचात भाजपाचाच विजय नक्की आहे. पण दूरगामी विचार करणारे भाजपचे चाणाक्य अन त्या रणनितीत फसलेले पवार ठाकरे घराण. आज पवार ठाकरे घराण्याला बिन पक्षांचे नेते करुन राजकिय कारकिर्दिलाच सुरुंग भाजपाई चाणाक्यांनी लावलाय. बर्याच लोकांना अन नेटकर्यांना वाटतय कि भाजपाची ही चूक आहे अजित पवारांना सरकारमध्ये घ्यायला नको होते. पण संघाचं मला नेहमी एक वाक्य आठवतं संघ समाजात विलान करायचा आहे. संघ संघाच्या कार्यपद्धतीने नक्कीच काम करतोय. पण संघाने कुणालाही शत्रु केलानाही किंवा करणारही नाही.राजकारणात ज्या गोष्टी होतात हे त्या काळच्या परिस्थितीवर अवलंबून असतं .कुणीच कुणाच राजकारणात कायम शत्रु नसतो.समाजात तु माझा शत्रु हा माझा शत्रु अस करुन ना संघ वाढेल ना भविष्यात समाजाचं त्यातून हित होईल.जनसामान्यांसाठी सर्वांनी एकत्र येण तितकच गरजेच. लोकहीत होण महत्वाच.
   
 व्यक्तिनिष्ट राजकारण भाजपने कधी केलय ना भविष्यात व्यक्तिनिष्ट राजकारण होईल. 75 वर्ष हिच भाजपची राजकारणातून निवृतीच वय आहे.कारण तेच योग्य आहे .तरुण पिढीकडे नेतृत्व जायला हवं .अन मग जुण्यांनी एक पाऊल मागं येनं गरजेचं.पुत्री प्रेमापोटी पवारांनी अजित दादाना डावलं तर बाळासाहेबांनी पुत्र प्रेमापोटी उद्धवना पुढ आणलं तिथच सेनेची अन राकॉचा र्हास झाला.कार्यकर्त्याचा पक्ष म्हणून फक्त भाजपची ओळख आहे तर बाकी पक्ष घराणेशाहीवर चालणारी पक्ष आहेत.त्यामुळेच आज यांची ही अवस्था झालीय अन भविष्यात पण असेच वागले तर अशीच अवस्था यांची होईल.रामाने राज्या धर्म सांगितला अन तो आमलात आणला ही पण सध्या रामराज्य कसे येईल हेच बघण महत्वाच आहे.
 
भविष्यात येणार्या निवडणूका ह्या सर्वच पक्ष एकट्याने लढवतील कारण प्रत्येकाला आपल अस्तित्व शिद्ध करायचं आहे अन निवडणूक आयोगापुढे एकट्या गटाची पक्षाची ताकद दाखवून पक्षाची मान्यता कायम ठवायची आहे. म्हणून सर्वच गट पक्ष वेगवेगळे लढतील अन स्वत:ला शिद्ध करतील. कारण कुणीच कमी जागांवर लढणार नाही. अन एक वेग वेगळ होऊन शेवटी निवडणूकीनंतर एकत्र येतील हेच सध्याचं राजकिय गणित सांगत आहे.भाजप पुर्ण ताकदीनिशी 145+ पुर्ण करेल हेच भाजपाई चाणाक्यनिती मनात ठेवून असणार. तेव्हा मतदार राज्याने हूशार व्हाव अन स्वहित समजून मतदान करावं.
Virendra Sonawane

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेनेचा वाद आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला