Festival Posters

इंटरनेट

Webdunia
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 (11:15 IST)
सध्याच्या काळात सर्वात मोठा आविष्कार म्हणजे इंटरनेट आहे. याचा माध्यमाने सर्व लोक संगणक किंवा मोबाईलच्या माध्यमाने एकमेकांशी जोडले गेले आहे. या साठी मोडेमची गरज असते. इंटरनेटच्या मदतीने लोक कोणतीही फाइल, फोटो आणि आवश्यक दस्तऐवज देखील एका जागे पासून दुसऱ्या जागी पाठवू शकतात किंवा मोबाईलने एका व्यक्ती पासून दुसऱ्या व्यक्तींपर्यंत कोणतीही माहिती पाठवू शकतात. याचा माध्यमाने लोक आपली गोष्ट जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या लोकांपर्यंत पसरवू शकतात.
 
आजच्या काळात इंटरनेट इतके महत्त्वाचे साधन आहे की ह्याचा शिवाय जगणं अशक्यच झाले आहे. ह्याचा एक फायदा असा आहे की लोक घरातच बसून सर्व माहिती मिळवू शकतात. आज इंटरनेट शाळेत, ऑफिसात, कॉलेजात, रुग्णालयात, रेल्वे स्थानकात, शोध कार्यासाठी, बॅंकेचे व्यवहार करण्यासाठी वापरले जाते. 
 
आपण घरातच बसून रेल्वेची, बसची, विमानाची, तिकिटे बुक करा शकता. तसेच शाळेच्या प्रकल्पासाठी मुलांना हे खूप महत्त्वाचे आहे. कुटुंबापासून दूर राहणारे नातेवाईक किंवा सदस्य देखील या मुळे जवळ आलेली वाटतात. कुठल्या ही ठिकाणी जाण्याचा प्रोग्रॅम देखील बनवू शकतो. इंटरनेटच्या माध्यमाने आपण आपल्यासाठी नोकरी शोधू शकतो. नवं घर देखील घरी बसल्या शोधू शकतो. इतकेच नव्हे तर आपला जोडीदार देखील याच्या वर शोधता येतो. 
 
या इंटरनेट चे जसे फायदे आहे तसे तोटे देखील आहे. लोक याचा गैर वापर करतात. तासंतास हे वापरतात. चांगल्या माहिती शिवाय नको ती माहिती मिळवून गैर वर्तन करतात. मुलं देखील अभ्यास सोडून तासंतास ह्याच्या वर गेम खेळतात. त्यामुळे त्यांच्या मेंदूवर तसेच डोळ्यांवर देखील परिणाम होतो. कधी कधी या वर दिलेली माहिती खरीच असेल असे नसतं. काही लोक याच्या वरून लोकांची फसवणूक देखील करतात. पैशे लुबाडतात. या साठी योग्य असा सायबर कायदा असावा. म्हणून सावधगिरीने इंटरनेट हाताळावे आणि योग्य कामासाठीच त्याचा वापर करावे. हे असं जाळ आहे ज्यामध्ये माणूस गुरफटच जातो.इंटरनेट आपला वेळ वाचविण्यासाठी विकसित केलेले आहे. त्याला मर्यादेनेच वापरावे. आपण इंटरनेटचे गुलाम होण्यापेक्षा त्यालाच आपले गुलाम करून ठेवावे नाही तर ते आपल्यासाठी नुकसानदायी होऊ शकतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी; रत्नागिरी येथून लवकरच प्रवासी विमानसेवा सुरू होणार

PM Kisan Maandhan Yojana लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, वृद्धापकाळात मासिक पेन्शन मिळणार!

आता तुमची इलेक्ट्रिक स्कूटर स्मार्टफोनप्रमाणे अपडेट होईल! OTA अपडेट्समुळे तुमच्या वाहनाची रेंज आणि वेग कसा वाढतो ते जाणून घ्या

उत्पन्नात घट होण्याची शक्यता, हे वर्ष शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चिंता व्यक्त केली

यवतमाळमध्ये मासिक वेतनाच्या मागणीसाठी परिचारिकांचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पुढील लेख
Show comments