Dharma Sangrah

पाणी वाचवा जीवन वाचवा

Webdunia
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020 (12:46 IST)
पाणी हे जीवन आहे. हे आपण सगळेच ऐकतच येत आहोत. पण आजच्या काळात देखील पाणी कोणीही वाचवत नाही. सर्व सजीव सृष्टीला पाण्याची फार आवश्यकता आहे. हे अमूल्य आहे. पाणी वाचवणे ही काळाची गरज आहे. आज जर आपण पाणी वाचवले नाही तर येणारी पिढी पाण्यासाठी तरसेल. पाण्याचे अपव्यय केल्यामुळे पाण्याची पातळी कमी होत आहे. लोक पाणी भरून गरज नसताना देखील नळ चालूच ठेवतात. बऱ्याच ठिकाणी पाणी सुरू करून कपडे धुतले जातात, भांडी स्वच्छ केले जातात. पाणी वाया जात या कडे कोणाचेच लक्ष नसते. अंघोळी साठी शॉवर चा वापर करतात. त्यामुळे खूप पाणी वाया जात. असे करू नये. इथे आपण पाणी वाया घालवतो आणि दुसरी कडे पाण्याच्या अभावी उन्हाळ्यात तहानलेले प्राणी, पक्षी मरण पावतात.
 
पाणी हा आपल्या जगण्याचा आधार आहे याला वाचविण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावे लागणार, शेती साठी पाण्याची गरज असते. पाणी नसेल तर पीक पण नसेल मग आपण काय खाणार? आपल्या दैनंदिनी व्यवहार देखील पाण्यानेच होतात. पाणी आपल्या जीवनासाठी अति आवश्यक आहे माणूस आपल्या जीवनात काही नसेल तरी राहू शकतो पण प्राणवायू ऑक्सिजन, पाणी आणि अन्न या शिवाय जगू शकत नाही पाणी प्रदूषणाच्या आजारांमुळे लोक मरण पावतात. म्हणून पाणी प्रदूषण होण्यापासून रोखले पाहिजे.
 
पावसाच्या पाण्याला संरक्षित करून आपण पाणी वाचवू शकतो. आंघोळ करताना शॉवर एवजी बादलीचा वापर करू शकतो. पाण्याचे काम झाल्यावर नळ घट्ट बंद करू शकतो. झाडे लावून आपल्या पर्यावरणाला संरक्षित ठेवू शकतो. सार्वजनिक स्थळांवर वाहत असलेल्या नळाला बंद करून पण पाण्याला वाचवू शकतो. लक्षात 
 
ठेवा पाणी देवाची दिलेली देणगी आहे. त्याचा अपव्यय करू नका. पृथ्वीवर याच्या शिवाय जगण्याची कल्पना देखील करता येणं अशक्य आहे. पाणी वाचवणे ही काळाची गरज आहे. लक्षात ठेवा -पाणी नाही तर आपण नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

नाना पटोले यांनी ईव्हीएम आणि बनावट मतदारच्या मुद्द्यांवरून पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला

LIVE: एल निनोच्या धोक्यामुळे राज्य सरकार सतर्क

US-Iran War: जगभरातील इंटरनेट बंद करण्याची इराणच्या खासदाराची धमकी

GT vs CSK: गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ८९ धावांनी सामना जिंकला

LIVE: हवामान खात्याने अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला

पुढील लेख
Show comments