Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंदिरा गांधी यांचा राजकारणातला प्रवास

Webdunia
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018 (12:14 IST)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पद
 
१९५९ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीत भाग घेतला. आणि त्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या.
 
माहिती व नभोवाणी मंत्री: जवाहरलाल नेहरूंच्या मृत्युनंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. यात त्यांनी माहिती व नभोवाणीमंत्री हे पद सांभाळले. याचदरम्यान त्यावेळच्या मद्रास राज्यात हिंदीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते. तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली. सरकारी अधिकारी, सामाजिक नेते यांची भेट घेउन राग शांत करण्याचा प्रयत्‍न केला. १९६५ चे भारत-पाक युद्ध या दरम्यान त्या श्रीनगर च्या आसपास सुट्या व्यतीत करत होत्या. पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्याकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला. अशा प्रकारच्या धाडसी कामांमुळे त्यांची लोकप्रिय छबी निर्माण करण्यात त्या यशस्वी झाल्या.
 
पाकचे आक्रमण परतून लावण्यात भारताला यश आले. १९६६ च्या जानेवारी महिन्यात तत्कालीन सोव्हियत संघात ताश्कंद येथे पाकिस्तानचे अयुब खान आणि लालबहादुर शास्त्री यात शांती समझोता झाला. पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धाच सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला. पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी अंतर्गत राजकारणातून इंदिरा गांधीना पाठिंबा दिला. ३५५ विरुद्ध १६९ मतांनी विजय मिळवला. त्या भारताच्या पाचव्या पंतप्रधान आणि पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

LIVE: आयएएस तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या २९ कर्मचाऱ्यांना थेट इशारा दिला

नियमांनुसार काम करता येत नसेल तर राजीनामा द्या…तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या २९ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

ट्रेनमध्ये धूम्रपान करणे आता खूप महागात पडणार! रेल्वेने दंड २० पटीने वाढवून ₹१०० वरून ₹२,००० केला

"तुम्हाला काम करायचे नाही, तर पगारही घेऊ नका," मुंबई उच्च न्यायालयाने डॉक्टरांना फटकारले; संप तात्काळ मागे घेण्याचे आदेश

उत्तम पीक येण्यासाठी आणि चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतीची महत्त्वाची कामे

पुढील लेख
Show comments