Dharma Sangrah

जाकार्ता बुडण्याच्या दिशेने

Webdunia
शुक्रवार, 13 एप्रिल 2018 (13:57 IST)
सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंडोनेशियाची राजधानी जाकार्ताचे अस्तित्व धोक्यात सापडले आहे. हे शहर सर्वाधिक वेगाने बुडत आहे. काही ठिकाणी तर ते वर्षाला नऊ इंचांनी पाण्याखाली जात आहे. पुढील काही दशकांमध्ये या शहराचे अनेक भाग पूर्णपणे बुडण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. या आपत्तीतून बचाव करण्यासाठी समुद्रकिनारी भिंत बांधण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र हा उपायही पुरेसा ठरणार नाही. समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे या शहरावर अशी वेळ आलेली नाही, तर त्यामागे अन्य कारणेही आहेत. त्यापैकी एक म्हणजे जमिनीचा स्तर खालावत जाणे. या समस्येचे खरे मूळ शहरात पाइपलाइनमधून पाण्याचा कमी पुरवठा होण्यामध्ये आहे. तिथे सुमारे एक कोटी लोक खासगी विहिरींतून पाण्याचा उपसा करत असून त्यावर जमीन टेकलेली आहे. अर्थात या जमिनीला सामान्ययपणे पाण्याने भरले जाऊ शकते. मात्र जाकार्तामध्ये 97टक्के शहर कॉँक्रिटच्या जमिनीने आच्छादलेले आहे. अशा स्थितीत पावसाचे पाणी जमिनीमधए मुरत नाही. ते समुद्राला वाहून जाते. त्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. दुसरीकडे जमिनीवर जमिनीवरील सीमेंट कॉँक्रिटच्यावजनामुळे जमीन खचत आहे. 2007 मध्ये आलेल्या भयंकर पुरानंतर ही समस्या लोकांच्या लक्षात आली होती. मात्र तरीही त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. शहराला या स्थितीतून सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. त्यात 40 अब्ज डॉलर खर्चून समुद्रकिनारी बांधल्या जाणार्‍या भिंतीचाही समावेश आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावरून वर्षा गायकवाड यांची अमित शाह आणि फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

LIVE: रूपाली चाकणकर यांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

एसटी कॉर्पोरेशन पुण्याहून ४५० अतिरिक्त बस चालवणार

चार प्रमुख विमानतळे २९ मार्चपासून बंद

फडणवीस सरकारला अजित पवार विमान अपघाताच्या तपासात रस नाही! रोहित पवार यांचा दावा

पुढील लेख
Show comments