Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2020: का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या उद्देश्य आणि इतिहास

Webdunia
बुधवार, 4 मार्च 2020 (12:05 IST)
भारतात दरवर्षी 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरा केला जातो. हा दिवस आता नेशनल सेफ्टी वीक म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा आठवडा म्हणून साजरा केला जातो.
 
उद्देश्य
4 ते 10 मार्च या दरम्यान साजरा होणार्‍या या आठवड्यात लोकांना जागरुक केलं जातं. सामान्य लोकांमध्ये सुरक्षेप्रती जागरुकता यावी तसेच अपघात होऊ नये हा उद्देश्य आहे. या आठवड्यात विभिन्न जागरुकता कार्यक्रमांच्या माध्यमातून औद्योगिक अपघातांपासून बचाव करण्याचे उपाय सांगण्यात येतात. या पूर्ण आठवड्यात केल्या जाणार्‍या क्रियाकलापांचा उद्देश्य लोकांना त्यांच्या सुरक्षेसाठी जागरुक करणे आहे. कारखान्यात काम करताना सुरक्षिततेची साधने वापरावी तसेच इमरजेंसी कशी हातळावी, राष्ट्रीय संपत्तीचे जतन आणि संवर्धन याचे देखील महत्तव असल्याची जाणीव करुन दिली जाते.
 
इतिहास
हा दिवस साजरा करावा यासाठी नेशनल सेफ्टी काउंसिलने पुढाकार घेतला होता. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात 4 मार्च 1972 पासून झाली आहे. या दिवशी भारतात नेशनल सेफ्टी काउंसिलची स्थापना झाली होती, म्हणून हा दिवस नेशनल सेफ्टी डे या रुपात साजरा केला जातो.
 
नेशनल सेफ्टी काउंसिल एक स्वायत्त संस्था आहे जी सार्वजनिक सेवेसाठी गैर शासकीय आणि गैर लाभकारी संघटनच्या रुपात कार्य करते. या संघटनाची स्थापना 1966 मध्ये मुंबई सोसायटी अधिनियम अंतर्गत झाली होती ज्यात आठ हजार सदस्य सामील होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मतदार ओळखपत्र असं काढतात, त्यासाठी ऑनलाईन अर्ज असा करा

नीता अंबानींचा लेकीसोबत घर मोरे परदेसिया' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल!

गोड पदार्थ सारखे सारखे का खावे वाटतात? त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करा या 10 गोष्टी

RBI guidelines change क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या नियमांमध्ये कोणते बदल? जाणून घ्या

आता आधार कार्ड या तारखे पूर्वी अपडेट करा

सर्व पहा

नवीन

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये टायगर सफारीवर बंदी ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाल्यात सापडला दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 9 वर्षीय मुलीचा मृतदेह, हात-पाय बांधलेले होते

Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात वाढ , आजचे दर जाणून घ्या

विदर्भाने मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव करत रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली

प्रेमासाठी केले सेक्स चेंज ऑपरेशन, प्रियकराने केली फसवणूक

पुढील लेख
Show comments