Marathi Biodata Maker

Subhash Chandra Bose Quotes नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार

Webdunia
शनिवार, 23 जानेवारी 2021 (08:10 IST)
*तुमचं भविष्य हे तुमच्याच हातात आहे.
*आपला मार्ग भलेही कठीण आणि खडकमय असो, आपला प्रवास कितीही खडतर असला तरी पुढे गेलंच पाहिजे. 
*यशाचा दिवस हे दूर असेल पण तो येईलच हे मात्र नक्की. 
*कधीही अधीर होऊ नका. तसंच कधीही अशी अपेक्षा करू नका की, ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अनेकांनी आयुष्य समर्पित केलं ते तुम्हाला एक-दोन दिवसातच मिळेल.
*एक व्यक्ती एक विचार मरू शकतो, पण हाच विचार त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर एक हजार आयुष्यात जन्म घेईल.
*राष्ट्रवाद हा मानवजातीच्या उच्चतम आदर्श सत्य, शिव आणि सुंदरतेने प्रेरित आहे. 
*आपल्याला केवळ कार्य करण्याचा अधिकार आहे. कर्म हेच आपलं कर्तव्य आहे. कर्माच्या फळाचा स्वामी हा देव आहे, आपण नाही. 
*आईचं प्रेम हे स्वार्थविरहीत आणि सर्वात निस्सीम असतं. हे प्रेमाचं मोजमाप कोणत्याही मापाने करता येणार नाही.
*श्रद्धेची कमतरता हीच साऱ्या कष्टांचं आणि दुखांचं मूळ असते. 
*जर संघर्षचं नसेल, कोणतंही भय समोर नसेल तर जीवनातील अर्धा रस संपेल.
*सकाळचा पहिला काही वेळ अंधाराचा नक्की असतो पण धाडसी व्हा आणि संघर्ष सुरू ठेवा. स्वातंत्र्य जवळच आहे.
*चारित्र्य निर्माण हे प्रत्येक विद्यार्थ्याचं मुख्य कर्तव्य आहे.
*संघर्षाने मला मनुष्य बनवलं, माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला जो माझ्यात आधी नव्हता.
*अपयश हाच कधी कधी यशाचा स्तंभ असतो.
*व्यर्थ गोष्टींमध्ये कधीही वेळ घालवू नका.
*मी जीवनाच्या अनिश्चिततेने कधीही घाबरलो नाही.
*फक्त मनुष्यबळ, पैसे आणि वस्तूंच्या दमावर स्वातंत्र्य मिळवता येणार नाही. आपल्याकडे प्रेरणा देणारी शक्तीही असली पाहिजे. जी आपल्याला साहसपूर्ण काम करण्याची प्रेरणा देईल.
*मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे की, जेव्हा मी जीवनात भरटकलो तेव्हा कोणत्या तरी किरणाने मला साथ दिली आणि जीवनात भरकटू दिलं नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

LIVE: राजमाता जिजाऊ' बसेस एसटी सेवेत सामील होणार

शिवनेरी आणि शिवशाहीनंतर 'राजमाता जिजाऊ' बसेस एसटी सेवेत सामील होणार

भिवाडी कारखान्यात आग, 7 कामगार जिवंत होरपळले , बचाव कार्य सुरू

गुजरातमधील 17 शाळांना बॉम्बची धमकी, अहमदाबाद आणि वडोदरा येथील शाळेत तपास तीव्र

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा तीव्र

पुढील लेख
Show comments