Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Subhash Chandra Bose Quotes नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार

Webdunia
शनिवार, 23 जानेवारी 2021 (08:10 IST)
*तुमचं भविष्य हे तुमच्याच हातात आहे.
*आपला मार्ग भलेही कठीण आणि खडकमय असो, आपला प्रवास कितीही खडतर असला तरी पुढे गेलंच पाहिजे. 
*यशाचा दिवस हे दूर असेल पण तो येईलच हे मात्र नक्की. 
*कधीही अधीर होऊ नका. तसंच कधीही अशी अपेक्षा करू नका की, ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अनेकांनी आयुष्य समर्पित केलं ते तुम्हाला एक-दोन दिवसातच मिळेल.
*एक व्यक्ती एक विचार मरू शकतो, पण हाच विचार त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर एक हजार आयुष्यात जन्म घेईल.
*राष्ट्रवाद हा मानवजातीच्या उच्चतम आदर्श सत्य, शिव आणि सुंदरतेने प्रेरित आहे. 
*आपल्याला केवळ कार्य करण्याचा अधिकार आहे. कर्म हेच आपलं कर्तव्य आहे. कर्माच्या फळाचा स्वामी हा देव आहे, आपण नाही. 
*आईचं प्रेम हे स्वार्थविरहीत आणि सर्वात निस्सीम असतं. हे प्रेमाचं मोजमाप कोणत्याही मापाने करता येणार नाही.
*श्रद्धेची कमतरता हीच साऱ्या कष्टांचं आणि दुखांचं मूळ असते. 
*जर संघर्षचं नसेल, कोणतंही भय समोर नसेल तर जीवनातील अर्धा रस संपेल.
*सकाळचा पहिला काही वेळ अंधाराचा नक्की असतो पण धाडसी व्हा आणि संघर्ष सुरू ठेवा. स्वातंत्र्य जवळच आहे.
*चारित्र्य निर्माण हे प्रत्येक विद्यार्थ्याचं मुख्य कर्तव्य आहे.
*संघर्षाने मला मनुष्य बनवलं, माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला जो माझ्यात आधी नव्हता.
*अपयश हाच कधी कधी यशाचा स्तंभ असतो.
*व्यर्थ गोष्टींमध्ये कधीही वेळ घालवू नका.
*मी जीवनाच्या अनिश्चिततेने कधीही घाबरलो नाही.
*फक्त मनुष्यबळ, पैसे आणि वस्तूंच्या दमावर स्वातंत्र्य मिळवता येणार नाही. आपल्याकडे प्रेरणा देणारी शक्तीही असली पाहिजे. जी आपल्याला साहसपूर्ण काम करण्याची प्रेरणा देईल.
*मी माझ्या अनुभवातून शिकलो आहे की, जेव्हा मी जीवनात भरटकलो तेव्हा कोणत्या तरी किरणाने मला साथ दिली आणि जीवनात भरकटू दिलं नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: कोरोना व्हेरिएंट जेएन-१ बाबत प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

छत्रपती संभाजीनगर: विद्यापीठ प्रशासनाने ९ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना प्रत्येकी ५०,००० रुपयांचा दंड ठोठावला

शिवसेनेने (यूबीटी) सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळांना पाठिंबा दिला, रिजिजू यांनी उद्धव यांच्याशी फोनवर चर्चा केली

गडचिरोली पोलिसांनी ५ नक्षलवाद्यांना अटक केली, घातक शस्त्रे जप्त

प्लेऑफपुर्वी मुंबईच्या टीममध्ये 3 बदल

पुढील लेख
Show comments