Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पांडव पंचमी का साजरी करतात, महत्त्व ,पूजाविधी जाणून घ्या

Webdunia
शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 (10:23 IST)
पांडव पंचमी म्हणजे पांडवांचा विजय दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पांडवांनी श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली अल्प संख्याबळ असूनही युद्ध करून कौरवसेनेचा नायनाट केला होता. या सणाचे महत्तव तसेच सण साजरा करण्याची पद्धत काय हे जाणून घ्या- 
 
श्रीकृष्णाच्या आदेशानुसार पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला, तो दिवस म्हणजे पांडव पंचमी. पांडव पंचमीला पांडवांची मनोभावे पूजा करून त्यांच्यात असलेले आदर्श गुण ग्रहण करणे असा उद्देश्य असावा. द्यूतात कौरवांकडून हरलेल्या पांडवांना कबूल केल्याप्रमाणे 12 वर्षे वनवास व 1 वर्ष अज्ञातवासात काढावे लागले. आजच्याच तिथीला म्हणजेच कार्तिक शुक्ल पंचमीला पांडव अज्ञातवासातून प्रकट झाले. पांडवांनी श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनाखाली कौरवांवर विजय मिळवला, तो दिवस म्हणजे पांडव पंचमी असे. 
 घरात त्यांच्यासारखे गुणवान पुत्र जन्माला यावे म्हणून पांडव पंचमी साजरा करतात. आणि पांडवांची पूजा करतात. 
 
पूजा विधी-
या दिवशी गायीच्या शेणापासून पांडव सिद्ध करतात आणि त्यांची पूजा करतात. 
पंचमीला वातावरणात ईश्वराकडून येणारी पांडवांची आदर्श तत्त्वे आणि गुण अधिक प्रमाणात असतात. गायीच्या शेणामध्ये ती मोठ्या प्रमाणात आकर्षिली जातात. घरात पांडव पंचमीची पूजा केल्याने आदर्श तत्त्वे आणि गुण आपल्यात येण्यास साहाय्य होते. 
गायीचे शेण सात्त्विक असून जिवाला लाभ होतो.
 
या दिवशी श्रीकृष्णाचा नामजप करावा. या प्रकारे प्रार्थना करावी की ‘हे कृष्णा, ज्याप्रमाणे तुझ्या आदेशानुसार पांडवांनी कौरवांच्या विरुद्ध युद्ध करून विजय मिळवला, त्याप्रमाणे आम्हाला गुरूंचे आज्ञापालन करून देवा तुझ्यासारखे गुण आमच्यात येण्याचे बळ दे. आमच्यावर सदैव तुझी कृपा असू दे. 
 
 हा दिवस जैन संस्कृतीत ज्ञानपंचमी म्हणून साजरा होतो. या दिवशी ध्यान व प्रार्थना केल्यास ‘ज्ञान’ प्राप्त होतं अशी आख्यायिका आहे. 
 






Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

आरती शनिवारची

प्रेमानंदजी महाराजांकडून जाणून घ्या सर्वात मोठे सुख कशात आहे?

शनिवारी जपावे हे 5 चमत्कारी मंत्र

Apara Ekadashi 2025 Naivedya अपरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला हे पदार्थ अपिर्त करा, श्री हरीचा आशीर्वाद कायम राहील

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments