Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कबीर दोहे मराठी अर्थासहित

Webdunia
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (15:31 IST)
काल करे सो आज कर, आज करे सो अब । 
पल में प्रलय होएगी,बहुरि करेगा कब ॥
कबीर दास जी म्हणतात की कोणतेही कार्य उद्यावर टाळू नये, जे करायचे आहे ते आजच करावे आणि ते आत्ताच या क्षणी करावे. कुणालाच ठाऊक नाही, पुढच्या क्षणी प्रलय आलं तर आयुष्य संपेल, मग जे करायचं ते कधी करणार.
 
ऐसी वाणी बोलिए, मन का आपा खोये। 
औरन को शीतल करे, आपहुं शीतल होए।।
कबीर दास जी म्हणतात की दुसर्‍यांच्या प्रती कठोर वाणीचा प्रयोग करु नये. दुसर्‍यांना सुख देणारी वाणी बोलावी ज्याने आपल्या मनालाही शांती मिळते.
 
निंदक नियरे राखिए, ऑंगन कुटी छवाय । 
बिन पानी, साबुन बिना, निर्मल करे सुभाय ।।
कबीर दास जी म्हणतात की जे तुमच्यावर टीका करतात त्यांना नेहमी सोबत ठेवावे. कारण ते लोक तुमचे दोष तुमच्यासमोर ठेवतात, ज्या सुधारून तुम्ही नेहमी प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल.
 
पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय ।
ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होय ।। 
कबीर दास जी म्हणतात की या जगात कोणालाच खरे ज्ञान किंवा अंतिम सत्य केवळ पुस्तके वाचून मिळू शकत नाही, यासाठी फक्त प्रेमाची अडीच अक्षरे पुरेशी आहेत.
 
बड़ा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर । 
पंथी को छाया नहीं फल लागे अति दूर ।।
कबीर दास जी म्हणतात की मानवी जीवनाचे उद्दिष्ट परोपरकार असले पाहिजे. जसे खजुराचे झाड उंच वाढले तरी ते प्रवाशाला सावली देत ​​नाही आणि त्याची फळेही दूरवर असतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुलांसाठी खास बनवा आंबट-गोड पास्ता रेसिपी

उन्हाळ्यात या भाज्या खाणे टाळा

बारावी नंतर समाजशास्त्रात BA करायचे असेल तर कोणते विषय घ्यावे लागतील जाणून घ्या

Hair Care:स्प्लिट एंड्सची समस्या असेल तर घरीच हे उपाय करा

उन्हाळ्यात लिंबाचा रस पिताना या सामान्य चुका करू नका

पुढील लेख
Show comments