Dharma Sangrah

स्वप्न आणि त्यांचे फळ, वाईट स्वप्न येत असल्यास हे उपाय करावे

Webdunia
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020 (09:42 IST)
स्वप्न शास्त्राच्या माध्यमाने स्वप्नांचा अभ्यास आणि त्यांचा फळांचा विचार केला जातो. आपण झोपताना बरीच स्वप्ने बघतो. त्यामध्ये काही स्वप्न शुभ असतात तर काही स्वप्न अशुभ घटनांचा संकेत देतात. बऱ्याच वेळा झोपताना आपल्याला वाईट स्वप्ने येतात की आपली झोपच मोड होते. 
 
अग्निपुराणानुसार, जर एखाद्याला वाईट स्वप्नामुळे जाग येत असल्यास तर त्यांनी पुन्हा झोपी जावे. असे केल्याने ते वाईट स्वप्न त्याच्या मेंदूमधून निघून जातं. सकाळी उठल्यावर मध्यरात्रीचे स्वप्ने लक्षात राहत नाही आणि शांत मनाने माणूस आपल्या कामाला लागू शकतो आणि एका नव्या दिवसाची सुरुवात करू शकतो.
 
स्वप्नशास्त्रानुसार, असे म्हटले जाते की, माणसाला चांगले किंवा वाईट स्वप्न त्याचा कर्मानुसार येतात. पण ब्राह्मणांची सेवा केल्याने माणसाला आपल्या वाईट कर्मापासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या वाईट स्वप्नांचा देखील नाश होतो. योग्य ब्राह्मणांची पूजा केल्याने आणि त्याला दान दिल्याने वाईट स्वप्नांपासून वाचता येऊ शकतं.
 
शास्त्रानुसार, घरात वास्तू दोष असल्यास देखील वाईट स्वप्न दोष होऊ शकतो आणि रात्री वाईट स्वप्न येतात. वास्तविक, आपल्या घराच्या भोवती असणाऱ्या नकारात्मक ऊर्जेमुळे अशुभ आणि वाईट स्वप्न येतात. म्हणून घराच्या सुख आणि शांततेसाठी नकारात्मक ऊर्जेला घरापासून दूर ठेवणे जरुरी असतं. घराच्या वास्तूला ठीक करावे आणि घरात हवन करवावे.
 
शास्त्रानुसार वाईट स्वप्नांना त्याच वेळी विसरावं. याचा उल्ल्लेख कोणाकडे देखील करू नये. असे केल्याने माणूस पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींचा विचार करतो आणि स्वप्नातली घटना त्याचा मेंदूतून निघत नाही आणि मनुष्य पुन्हा-पुन्हा त्याच स्वप्नाला आठवून तणाव घेतो.
 
शास्त्रानुसार, नियमितपणाने सूर्यदेवाची उपासना केल्यास वाईट स्वप्न पडत नाही. सूर्यदेवाला दररोज पाण्याने अर्घ्य द्यावे. असे म्हणतात की सूर्याला पाणी अर्पण केल्याने पाण्याच्या थेंबा माणसाच्या शरीरास स्पर्श करतात, ते माणसाच्या शरीर आणि मनाला शुद्ध करतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Ram Krishna Paramhans Jayanti 2026: त्यांचे महान कार्य, साधी राहणी आणि जगाला दिलेला शांततेचा संदेश

Shri Gangadhar Suprabhatam श्री गङ्गाधर सुप्रभातम्

सोमवती अमावस्याला हे उपाय करा, दारिद्रय दूर होईल

अंबरनाथ शिवमंदिर

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

पुढील लेख
Show comments