Publish Date: Wed, 18 Feb 2026 10:35:04 AM (IST)
Updated Date: Wed, 18 Feb 2026 01:44:48 PM (IST)
तुरटी पाणी शुद्ध करतेच त्यासोबतच तुरटीचे अनेक गुणधर्म आहे.
खोकला झाल्यावर तुरटी बारीक करून तव्यावर भाजून घ्यावी. अशाने त्यातील सर्व पाणी निघून जाईल आणि त्याची भुकटी तयार होईल. याला लाही असे देखील म्हटलं जातं. यात लहान चमचा मध मिसळून दिवसातून 2-3 वेळा चाटण थोडे थोडे चाटण्याने खोकल्यात आराम पडतो.
अंगावर कुठेही सूज असल्यास खोबर्याचे तेल लावून त्यावर तुरटीचा खडा चोळावा. सूज नाहीशी होते व वेदनेस त्वरित आराम मिळतो.