Marathi Biodata Maker

हळवी आठवण

Webdunia
मंगळवार, 16 जानेवारी 2018 (12:15 IST)
मोबाईल तर अस्तित्वात नव्हते पण साधे फोन पण सगळ्याकडे नव्हते.
जानेवारी सुरु झाला कि रस्त्यावर कुठेतरी तुरळक दुकान दिसायची न स्टेशनरीच्या दुकानात कार्ड यायची. मग छोट्या प्लास्टिक पिशव्यात तिळगुळ भरून मेणबत्तीने चिटकवून कार्डला स्टेपल करून पाकीट तयार करून पोस्टाने पाठवून द्यायची.
 
काही नुसती पाकीट यायची त्यात तिळगुळ आणि पत्र.
हाताने लिहिलेल्या शब्दांना स्पर्श असतो आणि सुगंध असतो ,नुसता शाईचा नाहीतर लिहिणाऱ्या माणसांच्या भावनांचा.
 
पाकिटातून आलेले चारदोन दाणे जेव्हा हातावर पडायचे तेव्हा एखाद्या नव्याने लग्न करून सासरी नांदणाऱ्या मुलीचा भाऊ नाहीतर वडील पत्रात शेवटी " काळजी घे " म्हणायचे तेव्हा तिच्या नकळत हुंदका यायचा , डोळ्यात आठवणी दाटून पाणी तरळून जायचं.
 
त्या पत्रातल्या अक्षरावरून हात फिरवला तरी मायेच्या माणसांच्या हाताचा स्पर्श जाणवत असायचा.
 
कितीही चांगले टाईप वापरून , रंग ,फोटोशॉप वापरून तयार केलेले मेसेज ढिगान येताहेत सोशल मिडीयावर पण त्या थरथरत्या हातानी लिहिलेल्या " काळजी घ्या " ची सर कशाला नाही.
 
आता अस पत्र हाताने कधी कुणाला लिहून पाठवल होत शेवटी हेही आठवत नाही , हाताने लिहिण थांबलंय तर पत्र लांबची गोष्ट.
 
हा फोटो न शुभेच्छा मेसेजचा पूर कितीही आला तरी कोरडा वाटतोय.
बदल होत राहतात , बदल होण एवढच फक्त चिरंतन आहे हेही कबूल पण असे दिवस काहीतरी जुन्या आठवणी चाळवून जातात न आतून सगळ ढवळून जातात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

उन्हाळ्यात भारतातील या सुंदर ठिकाणांना भेट द्या; जेथील थंड दऱ्या तुम्हाला देतील एक विलक्षण अनुभव

भूत बंगला'च्या प्रदर्शनापूर्वी, अक्षय कुमारने असरानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली

रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी'च्या माध्यमातून घेतलेला मोठा निर्णय मराठी चित्रपटसृष्टीचे भविष्य बदलू शकतो

मिर्झापूर: द मूव्ही हा सीझन ४ नसून एक नवीन अध्याय आहे, ज्यामध्ये नवीन कथा आणि मोठे बदल आहेत

पुढील लेख
Show comments